शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:02 IST

गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने

कृष्णा सावंत ।आजरा : गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्प तुडुंब भरला आहे. चहूबाजूने असलेला डोंगर, धरणाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटलेली असल्याने चालूवर्षी प्रकल्पाचे सौंदर्य भलतेच खुलले आहे. प्रकल्पापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत ३०० हेक्टरमध्ये पाणी साठल्याने प्रकल्पाला समुद्राचे स्वरूप आले आहे.

प्रकल्पाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटली आहे. भात रोपांचे मोठे वाफे हिरवाईने प्रकल्पावरून पाहताना मनमोहरून जाते. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे पर्यटक अल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. यावर्षीच्या फुललेल्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, मुंबई, गोवा, पुणे येथील पर्यटक प्रकल्पाचा आस्वाद घेत आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी आणि शंभर टक्के पुनर्वसनासाठी आवंडी, रायवाडा आणि गावठाणवाडी (आताचा चित्रानगर) येथील धरणग्रस्तांनी १९९२ पासून सन २००० पर्यंत संघर्ष केला. त्यामुळे चित्रीच्या सौंदर्याच्या समृद्धीबरोबरच पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार फुलला.

कर्नाटकातील संकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळाले. त्यामुळे चित्री धरणग्रस्तांच्या त्यागामुळे चित्रीचे सौंदर्य नटलेच, सोबत अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली.तालुक्यातील पाच हजार हेक्टर बहरलेचित्री प्रकल्पाचा आजरा तालुक्याला कमी लाभ झाला; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील पाच हजार हेक्टर शेती ओलिताखाली येऊन सर्वसामान्य शेतकºयांचे जीवन फुलले. आजरा, गडहिंग्लज आणि कर्नाटकातील शेतकºयांचे जीवनमान २२५ धरणग्रस्तांच्या त्यागामुळे खºया अर्थाने फुलले.इटे ते प्रकल्पापर्यंत रस्त्याची गरजइटे फाटा ते चित्री प्रकल्पापर्यंत चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसह पर्यटकांनाही यात्रा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होण्याची गरज व्यक्त होत आहे.रोजगार निर्मितीला संधीप्रकल्पामुळे चित्रीचे सौंदर्य व अनेकांचे जीवनमानही नटले आहे. चित्रीवर येणाºया पर्यटकांची संख्या पाहता रोजगार निर्मितीला संधी आहे. या ठिकाणी हॉटेल, विश्रामगृह, चहा-नाष्टा सेंटर, आदी व्यवसायांना चालना मिळू शकते.