शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

धरणग्रस्तांच्या त्यागातून फुलले चित्रीचे सौंदर्य : पर्यटकांचे लक्ष वेधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:02 IST

गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने

कृष्णा सावंत ।आजरा : गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्प तुडुंब भरला आहे. चहूबाजूने असलेला डोंगर, धरणाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटलेली असल्याने चालूवर्षी प्रकल्पाचे सौंदर्य भलतेच खुलले आहे. प्रकल्पापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत ३०० हेक्टरमध्ये पाणी साठल्याने प्रकल्पाला समुद्राचे स्वरूप आले आहे.

प्रकल्पाच्या खाली असलेली शेती हिरवाईने नटली आहे. भात रोपांचे मोठे वाफे हिरवाईने प्रकल्पावरून पाहताना मनमोहरून जाते. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस यामुळे पर्यटक अल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घेत आहेत. यावर्षीच्या फुललेल्या सौंदर्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. कोल्हापूरसह सातारा, सांगली, मुंबई, गोवा, पुणे येथील पर्यटक प्रकल्पाचा आस्वाद घेत आहेत. हा प्रकल्प साकारण्यासाठी आणि शंभर टक्के पुनर्वसनासाठी आवंडी, रायवाडा आणि गावठाणवाडी (आताचा चित्रानगर) येथील धरणग्रस्तांनी १९९२ पासून सन २००० पर्यंत संघर्ष केला. त्यामुळे चित्रीच्या सौंदर्याच्या समृद्धीबरोबरच पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार फुलला.

कर्नाटकातील संकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळाले. त्यामुळे चित्री धरणग्रस्तांच्या त्यागामुळे चित्रीचे सौंदर्य नटलेच, सोबत अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली.तालुक्यातील पाच हजार हेक्टर बहरलेचित्री प्रकल्पाचा आजरा तालुक्याला कमी लाभ झाला; परंतु गडहिंग्लज तालुक्यातील पाच हजार हेक्टर शेती ओलिताखाली येऊन सर्वसामान्य शेतकºयांचे जीवन फुलले. आजरा, गडहिंग्लज आणि कर्नाटकातील शेतकºयांचे जीवनमान २२५ धरणग्रस्तांच्या त्यागामुळे खºया अर्थाने फुलले.इटे ते प्रकल्पापर्यंत रस्त्याची गरजइटे फाटा ते चित्री प्रकल्पापर्यंत चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांसह पर्यटकांनाही यात्रा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण होण्याची गरज व्यक्त होत आहे.रोजगार निर्मितीला संधीप्रकल्पामुळे चित्रीचे सौंदर्य व अनेकांचे जीवनमानही नटले आहे. चित्रीवर येणाºया पर्यटकांची संख्या पाहता रोजगार निर्मितीला संधी आहे. या ठिकाणी हॉटेल, विश्रामगृह, चहा-नाष्टा सेंटर, आदी व्यवसायांना चालना मिळू शकते.