शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

लखनौमध्ये रंगला महाराष्ट्र दिनाचा सुंदर सोहळा

By admin | Updated: May 3, 2017 00:03 IST

उत्तर प्रदेशच्या राजभवनात मराठीचा डंका : गलाई बांधवांनी जोपासली महाराष्ट्राची अस्मिता

विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या पुढाकाराने लखनौ येथील राजभवनच्या प्रांगणात सोमवारी महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा पार पाडला. सोहळ्याला उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, डॉ. प्रकाश आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक असलेल्यांपैकी सुमारे एक ते दीड हजार मराठी बांधवांनी पांढरा पायजमा, नेहरू शर्ट आणि गांधी टोपी अशा पारंपरिक पोशाखात हजेरी लावल्याने लखनौच्या राजभवनचे आवार अक्षरश: मराठीमय झाले होते.या गलाई व्यावसायिकांनी राम नाईक यांची भेट घेऊन लखनौमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्याची परवानगी मागितली. नाईक यांनी तातडीने संमती देऊन लखनौ येथील राजभवनची जागा कार्यक्रमासाठी दिली.उत्तरप्रदेश मराठी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ मे रोजी सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या राजभवन प्रांगणात पारंपरिक वेशभूषेत प्रवेश करताच वातावरण मराठीमय झाले. राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह संजयकाका पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावली.‘जय शिवाजी, जय भवानी च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव मिणशे, मुख्य सचिव सुधवर बोबडे, सचिव ज्योतिका पाटकर, अलिगढचे ऋषिकेश भास्कर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप साळुंखे, संजय तरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक एस. बी. तिरोडकर, आजमगढचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी, ऋती सुगणकर, जॉर्इंट कमिशनर वृंदा देसाई, संघटनेचे विश्वनाथ देवकर, पांडुरंग राऊत, गजानन पाटील, आग्राचे लालासाहेब महिंद, विनायक पवार, मिर्जापूरचे मराठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)योगींचे ‘जय महाराष्ट्र’उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीतून केली. त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख केल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतूनच त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणे उत्तरप्रदेशचा स्थापना दिन दि.२४ जानेवारीला साजरा करण्यात येईल, अशी घोषणा आदित्यनाथ यांनी यावेळी केली. गीत रामायण व भावगीतांची मैफल...लखनौच्या राजभवनात महाराष्ट्र दिनाचा योग पहिल्यांदाच घडवून आणण्यात आला. मराठी मंडळाचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्यासह मराठी गलाई बांधवांनी नेटके नियोजन केले होते. श्रीधर फडके यांच्या गीत रामायण व भावगीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याला चांगलीच रंगत आली होती.