शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

लखनौमध्ये रंगला महाराष्ट्र दिनाचा सुंदर सोहळा

By admin | Updated: May 3, 2017 00:03 IST

उत्तर प्रदेशच्या राजभवनात मराठीचा डंका : गलाई बांधवांनी जोपासली महाराष्ट्राची अस्मिता

विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या पुढाकाराने लखनौ येथील राजभवनच्या प्रांगणात सोमवारी महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा पार पाडला. सोहळ्याला उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, डॉ. प्रकाश आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक असलेल्यांपैकी सुमारे एक ते दीड हजार मराठी बांधवांनी पांढरा पायजमा, नेहरू शर्ट आणि गांधी टोपी अशा पारंपरिक पोशाखात हजेरी लावल्याने लखनौच्या राजभवनचे आवार अक्षरश: मराठीमय झाले होते.या गलाई व्यावसायिकांनी राम नाईक यांची भेट घेऊन लखनौमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्याची परवानगी मागितली. नाईक यांनी तातडीने संमती देऊन लखनौ येथील राजभवनची जागा कार्यक्रमासाठी दिली.उत्तरप्रदेश मराठी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ मे रोजी सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या राजभवन प्रांगणात पारंपरिक वेशभूषेत प्रवेश करताच वातावरण मराठीमय झाले. राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह संजयकाका पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावली.‘जय शिवाजी, जय भवानी च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव मिणशे, मुख्य सचिव सुधवर बोबडे, सचिव ज्योतिका पाटकर, अलिगढचे ऋषिकेश भास्कर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप साळुंखे, संजय तरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक एस. बी. तिरोडकर, आजमगढचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी, ऋती सुगणकर, जॉर्इंट कमिशनर वृंदा देसाई, संघटनेचे विश्वनाथ देवकर, पांडुरंग राऊत, गजानन पाटील, आग्राचे लालासाहेब महिंद, विनायक पवार, मिर्जापूरचे मराठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)योगींचे ‘जय महाराष्ट्र’उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीतून केली. त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख केल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतूनच त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणे उत्तरप्रदेशचा स्थापना दिन दि.२४ जानेवारीला साजरा करण्यात येईल, अशी घोषणा आदित्यनाथ यांनी यावेळी केली. गीत रामायण व भावगीतांची मैफल...लखनौच्या राजभवनात महाराष्ट्र दिनाचा योग पहिल्यांदाच घडवून आणण्यात आला. मराठी मंडळाचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्यासह मराठी गलाई बांधवांनी नेटके नियोजन केले होते. श्रीधर फडके यांच्या गीत रामायण व भावगीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याला चांगलीच रंगत आली होती.