शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लखनौमध्ये रंगला महाराष्ट्र दिनाचा सुंदर सोहळा

By admin | Updated: May 3, 2017 00:03 IST

उत्तर प्रदेशच्या राजभवनात मराठीचा डंका : गलाई बांधवांनी जोपासली महाराष्ट्राची अस्मिता

विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या पुढाकाराने लखनौ येथील राजभवनच्या प्रांगणात सोमवारी महाराष्ट्र दिनाचा दिमाखदार सोहळा पार पाडला. सोहळ्याला उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, डॉ. प्रकाश आमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तरप्रदेशमध्ये स्थायिक असलेल्यांपैकी सुमारे एक ते दीड हजार मराठी बांधवांनी पांढरा पायजमा, नेहरू शर्ट आणि गांधी टोपी अशा पारंपरिक पोशाखात हजेरी लावल्याने लखनौच्या राजभवनचे आवार अक्षरश: मराठीमय झाले होते.या गलाई व्यावसायिकांनी राम नाईक यांची भेट घेऊन लखनौमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्याची परवानगी मागितली. नाईक यांनी तातडीने संमती देऊन लखनौ येथील राजभवनची जागा कार्यक्रमासाठी दिली.उत्तरप्रदेश मराठी समाज संघटनेचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ मे रोजी सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या राजभवन प्रांगणात पारंपरिक वेशभूषेत प्रवेश करताच वातावरण मराठीमय झाले. राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह संजयकाका पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावली.‘जय शिवाजी, जय भवानी च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव मिणशे, मुख्य सचिव सुधवर बोबडे, सचिव ज्योतिका पाटकर, अलिगढचे ऋषिकेश भास्कर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संदीप साळुंखे, संजय तरडे, विशेष पोलिस महानिरीक्षक एस. बी. तिरोडकर, आजमगढचे पोलिस अधीक्षक आनंद कुलकर्णी, ऋती सुगणकर, जॉर्इंट कमिशनर वृंदा देसाई, संघटनेचे विश्वनाथ देवकर, पांडुरंग राऊत, गजानन पाटील, आग्राचे लालासाहेब महिंद, विनायक पवार, मिर्जापूरचे मराठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कदम उपस्थित होते. (वार्ताहर)योगींचे ‘जय महाराष्ट्र’उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात चक्क मराठीतून केली. त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असा उल्लेख केल्यानंतर टाळ््यांचा कडकडाट झाला. मराठीतूनच त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाप्रमाणे उत्तरप्रदेशचा स्थापना दिन दि.२४ जानेवारीला साजरा करण्यात येईल, अशी घोषणा आदित्यनाथ यांनी यावेळी केली. गीत रामायण व भावगीतांची मैफल...लखनौच्या राजभवनात महाराष्ट्र दिनाचा योग पहिल्यांदाच घडवून आणण्यात आला. मराठी मंडळाचे अध्यक्ष उमेशशेठ पाटील यांच्यासह मराठी गलाई बांधवांनी नेटके नियोजन केले होते. श्रीधर फडके यांच्या गीत रामायण व भावगीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याला चांगलीच रंगत आली होती.