शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

रंंकाळ्याच्या धर्तीवर राजाराम तलावाचे सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : रंकाळ्याच्या धर्तीवर राजाराम तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला ...

कोल्हापूर : रंकाळ्याच्या धर्तीवर राजाराम तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २ कोटी २५ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा निधी मागणी प्रस्ताव आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावर ठाकरे यांनी पर्यटनदृष्ट्या तलावांचे महत्त्व वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितल्याने राजाराम तलावाच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शिवाजी विद्यापीठ व राष्ट्रीय महामार्गालगत असलेला राजाराम तलाव हा छत्रपती राजाराम महाराजांनी उचगाव व सरनोबतवाडी गावच्या शेतीसाठी बारमाही पाण्याचा पुरवठा व्हावा या करिता १९२८ मध्ये बांधून घेतला. निसर्गरम्य परिसर असल्याने येथे सकाळ, संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

रंकाळा, कळंबा तलावाप्रमाणे या देखील तलावाचे सुशोभीकरण झाले तर हे पर्यटनाचे केंद्र होऊ शकेल, यादृष्टीने आमदार ऋतुराज पाटील यांनी हा आराखडा तयार करून घेतला. प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत यासाठी निधी घेता येत असल्याने शुक्रवारी आमदार पाटील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्याकडे देत निधीची मागणी केली. यावर मंत्री ठाकरे यांनी सकारात्मक असल्याचे सांगितले.

फोटो: १६०७२०२१-कोल-आमदार पाटील

फोटो ओळ : कोल्हापुरातील राजाराम तलाव सुशोभीकरण प्रस्ताव आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे देऊन निधीची मागणी केली.