शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथील कागल संघाच्या इमारतीत स्थलांतर झाले, त्यावेळ ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. कोल्हापूर महापालिकेत गेली पंधरा वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यामुळे निवडणूक ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रभागात फिरत असल्याचे ऐकले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जो निकाल लागला, त्या चटक्यातून सावरण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.

भाजपची डिपॉझिट जप्त होईल

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढावी, अशी अपेक्षा श्रेष्ठींची आहे. मात्र, स्थानिक विचार करता अडचणी असल्याने निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपची डिपॉझिट जप्त होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

युपीएच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहीती देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, युपीएमध्ये शिवसेनेने यावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

म्हणूनच सरपंच आरक्षण लांबणीवर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर संबंधित आरक्षणाच्या प्रभागात चुरस व ईर्षा निर्माण होते. वारेमाप पैसा खर्च होतोच, त्याचबरोबर चुकीचे दाखले काढले जातात. पडताळणीमध्ये अवैध ठरल्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागते. यासाठी सरपंच आरक्षण लांबणीवर टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

- राजाराम लोंढे