शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथील कागल संघाच्या इमारतीत स्थलांतर झाले, त्यावेळ ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. कोल्हापूर महापालिकेत गेली पंधरा वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यामुळे निवडणूक ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रभागात फिरत असल्याचे ऐकले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जो निकाल लागला, त्या चटक्यातून सावरण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.

भाजपची डिपॉझिट जप्त होईल

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढावी, अशी अपेक्षा श्रेष्ठींची आहे. मात्र, स्थानिक विचार करता अडचणी असल्याने निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपची डिपॉझिट जप्त होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न

युपीएच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहीती देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, युपीएमध्ये शिवसेनेने यावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

म्हणूनच सरपंच आरक्षण लांबणीवर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर संबंधित आरक्षणाच्या प्रभागात चुरस व ईर्षा निर्माण होते. वारेमाप पैसा खर्च होतोच, त्याचबरोबर चुकीचे दाखले काढले जातात. पडताळणीमध्ये अवैध ठरल्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागते. यासाठी सरपंच आरक्षण लांबणीवर टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

- राजाराम लोंढे