शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेडे व्हा, कष्टाला कधी लाजू नका

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

‘अभिग्यान’मधून प्रेरणा : डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद; ‘केआयटी’चा उपक्रम

कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरूर कमवा; मात्र समाजासाठीदेखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका, असा प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१७’मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉन्फरन्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात, ते ओळखून ‘गोली वडा’ची सुरुवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा; मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाऱ्या आव्हानांना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रिअल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था, आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेची साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले तरच मोठा बदल घडू शकतो; कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारी रूप आणून त्यांत रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे; मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत राहा, समाजासाठी काम करा. ‘नाम’ संस्था यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार आहे. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टी, अनुभवांतून स्वत:चे करिअर घडविले. आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या दोन हातांचा उपयोग नोकरीसाठीच्या विनवणीकरिता करू नका. उद्योग-व्यवसायाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक राहा. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, मागासवर्गीय समाजातील युवकांना ‘दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून नोकरी, राजकारण सोडून उद्योजकतेचा मार्ग दाखवून दिला आहे. शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्रोतांचा योग्य वापर करा. कौशल्य विकास साधा. या कार्यक्रमास ‘केआयटी’चे उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रॉडक्शनचे प्रमुख ए. एम. पिसे, अधिष्ठाता प्रीती पाटील, ‘वॉक विथ वर्ल्ड’चे समन्वयक प्रा. हर्षद ठाकूर, आदींसह विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)