शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

ध्येयवेडे व्हा, कष्टाला कधी लाजू नका

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

‘अभिग्यान’मधून प्रेरणा : डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद; ‘केआयटी’चा उपक्रम

कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरूर कमवा; मात्र समाजासाठीदेखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका, असा प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१७’मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉन्फरन्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात, ते ओळखून ‘गोली वडा’ची सुरुवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा; मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाऱ्या आव्हानांना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रिअल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था, आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेची साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले तरच मोठा बदल घडू शकतो; कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारी रूप आणून त्यांत रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे; मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत राहा, समाजासाठी काम करा. ‘नाम’ संस्था यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार आहे. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टी, अनुभवांतून स्वत:चे करिअर घडविले. आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या दोन हातांचा उपयोग नोकरीसाठीच्या विनवणीकरिता करू नका. उद्योग-व्यवसायाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक राहा. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, मागासवर्गीय समाजातील युवकांना ‘दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून नोकरी, राजकारण सोडून उद्योजकतेचा मार्ग दाखवून दिला आहे. शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्रोतांचा योग्य वापर करा. कौशल्य विकास साधा. या कार्यक्रमास ‘केआयटी’चे उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रॉडक्शनचे प्रमुख ए. एम. पिसे, अधिष्ठाता प्रीती पाटील, ‘वॉक विथ वर्ल्ड’चे समन्वयक प्रा. हर्षद ठाकूर, आदींसह विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)