शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

ध्येयवेडे व्हा, कष्टाला कधी लाजू नका

By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST

‘अभिग्यान’मधून प्रेरणा : डी. एस. कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांच्यासह दिग्गजांनी साधला संवाद; ‘केआयटी’चा उपक्रम

कोल्हापूर : ध्येयवेडे व्हा. पैसा जरूर कमवा; मात्र समाजासाठीदेखील योगदान द्या. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका, असा प्रेरणादायी सल्ला देत उद्योग-व्यवसाय, चित्रपट, सामाजिक क्षेत्रांतील दिग्गजांनी रविवारी केआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१७’मध्ये उद्योगपती डी. एस. कुलकर्णी, चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, उद्योजक मिलिंद कांबळे, व्यंकटेश अय्यर, ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक संजय नहार या दिग्गज मार्गदर्शकांच्या यशकथांतून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिरात सकाळी दहा वाजता उद्योजक व्यंकटेश अय्यर यांच्या हस्ते ‘अभिग्यान इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉन्फरन्स’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी उद्योजक अय्यर म्हणाले, भारतीय लोक देशी खाद्यपदार्थांनाच अधिक पसंती देतात, ते ओळखून ‘गोली वडा’ची सुरुवात केली. या व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जात यशस्वी ठरलो. कोणताही व्यवसाय करा; मात्र त्यात गुणवत्ता राखा, अनावश्यकपणा टाळा. समोर येणाऱ्या आव्हानांना धाडसाने सामोरे जा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अभिनेते अनासपुरे म्हणाले, आजच्या तरुणाईने रिल हिरो आणि रिअल हिरोतील फरक समजून घेण्याची गरज आहे. शेतकरी, सामाजिक व्यवस्था, आदींसह प्रत्येक गोष्टीकडे आपण चांगुलपणा, समंजसपणा, बारकाईने बघितले पाहिजे. सकारात्मकतेची साखळी सुरू ठेवावी. तरुणांनी ठरविले तरच मोठा बदल घडू शकतो; कारण त्यांच्यात मोठी ऊर्जा आहे. सण-उत्सवांना बाजारी रूप आणून त्यांत रममाण होणे टाळावे. ध्येयवेड्या लोकांचा आदर्श घ्या. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे; मात्र तो किती कमवायचा हे ठरवा. आयुष्यातील काही वेळ निवांत राहा, समाजासाठी काम करा. ‘नाम’ संस्था यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी काम करणार आहे. उद्योगपती कुलकर्णी म्हणाले, छोट्या-छोट्या गोष्टी, अनुभवांतून स्वत:चे करिअर घडविले. आयुष्यातील संकटांना धैर्याने सामोरे जा. आपल्या दोन हातांचा उपयोग नोकरीसाठीच्या विनवणीकरिता करू नका. उद्योग-व्यवसायाद्वारे या हातांची जादू दाखवा. आयुष्यात भांडण टाळा, आरोग्य जपा, सकारात्मक राहा. नोकरी अथवा व्यवसाय करा; पण त्यात उत्कृष्ट बना. कष्टाला लाजू नका. उद्योजक कांबळे म्हणाले, मागासवर्गीय समाजातील युवकांना ‘दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून नोकरी, राजकारण सोडून उद्योजकतेचा मार्ग दाखवून दिला आहे. शिक्षण घेतानाच आयुष्यात काय करायचे हे ठरवा. पुस्तकी शिक्षणासह प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यावर भर द्या. उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञान, माहितीच्या स्रोतांचा योग्य वापर करा. कौशल्य विकास साधा. या कार्यक्रमास ‘केआयटी’चे उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली, विश्वस्त सुनील कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. एम. मुजुमदार, प्रॉडक्शनचे प्रमुख ए. एम. पिसे, अधिष्ठाता प्रीती पाटील, ‘वॉक विथ वर्ल्ड’चे समन्वयक प्रा. हर्षद ठाकूर, आदींसह विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)