शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नरकेंच्या पराभवासाठी एक व्हा

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

कुंभी कारखाना निवडणूक : बीडशेड येथे विरोधी नेत्यांचे मत

सावरवाडी : कुंभी-कासारी साखर कारखान्यातील होणारी लूट थांबविण्याबरोबर राजकीय अड्डा मोडण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढविली पाहिजे. कुंभी-कासारीच्या परिवर्तनासाठी कायकर्त्यांनी एकत्र येऊन एकास एक लढतीतून नवी क्रांती घडवावी, असे मत राजर्षी शाहू आघाडीच्या बीडशेड (ता. करवीर) येथे आयोजित बैठकीत नेत्यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई म्हणाले, नरके यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कुंभी-कासारी साखर कारखान्याचा वापर केला. विधानसभा निवडणुकीत कारखान्याचा बाजार मांडल्याने सध्या ‘कुंभी-कासारी’ कर्जबाजारी झाला. नरके यांच्या पराभवासाठी शेतकऱ्यांनी रान उठविले पाहिजे. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, कुंभी-कासारीत सत्ता बदल हा शेतकऱ्यांचा विजय आहे. गेल्या दहा वर्षांत कारखाना कार्यक्षेत्रात कोणताच विकास झाला नाही. ही निवडणूक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच होणार आहे. त्यामुळे एकी महत्वाची आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील म्हणाले, कुंभी-कासारीत समविचारी कार्यकर्त्यांनी नव्या बदलाकरिता एकत्र येणे गरजेचे आहे. बहुरंगी लढतीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.यावेळी कुंभी-कासारी बचाव समितीचे अध्यक्ष बाजीराव खाडे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील, पांडुरंग जाधव, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, पी. आर. पाटील, सज्जन पाटील, बाजीराव पाटील, यशवंत बँकेचे संचालक दिलीप खाडे, केरबा जाधव, बाबूराव ल. जाधव, श्रीपतराव दिवसे, यशवंत बँकेचे संचालक सर्जेराव हुजरे, मारुती कंदले, आदींनी मनोगत व्यक्त केले. भगवान सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डी. वाय. माने यांनी आभार मानले.बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक सत्यजित पाटील, तुकाराम माने यांच्यासहित काँग्रेस पक्ष, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)संदीप नरके यांच्या भूमिकेकडे लक्षकुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सुपुत्र संदीप नरके यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संदीप नरके काय भूमिका घेणार, याबाबत बैठकीत चर्चा झाली. संदीप नरके शेवटपर्यंत नरके विरोधी राहणार काय? असा प्रश्नही चर्चेत आला.