शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

नरकेंच्या पराभवासाठी एक व्हा

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

कुंभी कारखाना निवडणूक : बीडशेड येथे विरोधी नेत्यांचे मत

सावरवाडी : कुंभी-कासारी साखर कारखान्यातील होणारी लूट थांबविण्याबरोबर राजकीय अड्डा मोडण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढविली पाहिजे. कुंभी-कासारीच्या परिवर्तनासाठी कायकर्त्यांनी एकत्र येऊन एकास एक लढतीतून नवी क्रांती घडवावी, असे मत राजर्षी शाहू आघाडीच्या बीडशेड (ता. करवीर) येथे आयोजित बैठकीत नेत्यांनी व्यक्त केले. राजर्षी शाहू आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश देसाई म्हणाले, नरके यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कुंभी-कासारी साखर कारखान्याचा वापर केला. विधानसभा निवडणुकीत कारखान्याचा बाजार मांडल्याने सध्या ‘कुंभी-कासारी’ कर्जबाजारी झाला. नरके यांच्या पराभवासाठी शेतकऱ्यांनी रान उठविले पाहिजे. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, कुंभी-कासारीत सत्ता बदल हा शेतकऱ्यांचा विजय आहे. गेल्या दहा वर्षांत कारखाना कार्यक्षेत्रात कोणताच विकास झाला नाही. ही निवडणूक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच होणार आहे. त्यामुळे एकी महत्वाची आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील म्हणाले, कुंभी-कासारीत समविचारी कार्यकर्त्यांनी नव्या बदलाकरिता एकत्र येणे गरजेचे आहे. बहुरंगी लढतीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.यावेळी कुंभी-कासारी बचाव समितीचे अध्यक्ष बाजीराव खाडे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पाटील, पांडुरंग जाधव, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, पी. आर. पाटील, सज्जन पाटील, बाजीराव पाटील, यशवंत बँकेचे संचालक दिलीप खाडे, केरबा जाधव, बाबूराव ल. जाधव, श्रीपतराव दिवसे, यशवंत बँकेचे संचालक सर्जेराव हुजरे, मारुती कंदले, आदींनी मनोगत व्यक्त केले. भगवान सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डी. वाय. माने यांनी आभार मानले.बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक सत्यजित पाटील, तुकाराम माने यांच्यासहित काँग्रेस पक्ष, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)संदीप नरके यांच्या भूमिकेकडे लक्षकुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे सुपुत्र संदीप नरके यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संदीप नरके काय भूमिका घेणार, याबाबत बैठकीत चर्चा झाली. संदीप नरके शेवटपर्यंत नरके विरोधी राहणार काय? असा प्रश्नही चर्चेत आला.