शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! शहर, जिल्ह्यातील डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया, काविळचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, ...

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया, काविळचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका, जिल्हा रुग्णालयातील ओपीडी रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. अलीकडे या रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा मिळेनासी झाली आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. एडीस इजिप्ताय डासापासून डेंग्यू, चिकुनगुनिया आजार बळावतो. त्याचा फैलावही होतो. घरात आणि परिसरातील साठलेल्या पाण्यात या डासाची उत्पत्ती होते. यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे रूग्ण वाढत आहेत. नैसर्गिक स्रोत, प्रवाहीत पाणीही दूषित झाल्याने पिण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पाण्याचा अभाव आहे. परिणामी दूषित पाण्यामुळे काविळचे रुग्ण वाढत आहेत. एकेका कुटुंबांत अनेक रुग्ण सापडत आहेत. या आजाराची गावात साथ आल्यासारखी परिस्थिती आहे. हे तिन्ही आजार किरकोळ आहेत. पण दुर्लक्ष झाल्यास जीवघेणा ठरत आहे. शहरात डेंग्यूने मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

१) सध्या उपचार घेत लेले रुग्ण

डेंग्यू - २६

चिकुनगुनिया - ३७

काविळ - १६

२) रोज किमान १० पेशंट

डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळचे रोज कमीत कमी ५ आणि अधिकाधिक १० रुग्ण मिळत आहेत. या आजाराने गंभीर असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होवून उपचार घेत आहेत. पहिल्या टप्प्यातील रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेवून घरी जाताना दिसतात.

३) लहान मुलांचे प्रमाण जास्त

साथीच्या आजाराला लहान मुलेही मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. डेंग्यू, काविळ या आजाराचे प्रमाणत लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहे. यामुळे बालरोगतज्ज्ञांकडेही बाल रुग्णांची गर्दी होत आहे.

४) काय आहेत लक्षणे?

डेंग्यू - तीव्र ताप, तीव्र डोके दुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, तीव्र डोळेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी व जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव, नाकाकडून रक्तस्राव, रक्ताची उलटी, रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे.

चिकुनगुनिया - ताप, डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी.

कावीळ - ताप, भूक मंदावणे, मळमळणे, थकवा येणे, उलटी होणे, डोळे पिवळे दिसणे, लघवी पिवळी होणे.

५) कोट

सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. म्हणून लक्षणे जाणवता क्षणी रक्तांची तपासणी करून घेवून निदान, उपचार घ्यावेत.

डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी