शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव बाजार समितीत वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

एक आॅगस्टला मतदान : १९०४ मतदार; १९ जागा; राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसचे इच्छुक सरसावले

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु झाली आहे. १९ जागांसाठी निवडणूक होणार असून १९०४ मतदार आहेत. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या गटाची संयुक्त सत्ता होती. बाजार समितीचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आघाडी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून संचालक मंडळाऐवजी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० जून ते २४ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २६ जूनला नामनिर्देशन छाननी, २७ जूनला प्रसिध्दी होणार आहे. १३ आणि १४ जुलैला अर्ज माघारसाठी मुदत आहे. १५ जुलैला उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. २ आॅगस्टला निकाल जाहीर होणार आहे.एकूण १९ जागांसाठी मतदान होणार आहे. सहकारी संस्थांतील ११ पैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७, इतर मागास प्रवर्गासाठी १, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी १ आणि महिला प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित आहेत. ग्रामपंचायत गटासाठी ४ जागा असून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमातीसाठी १ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी १ जागा आरक्षित आहे. व्यापाऱ्यांसाठी १, हमाल-तोलाईदारांसाठी १ जागा आहे. कृषी, प्रक्रिया उद्योग मतदार संघासाठी १ जागा आहे. संस्थांत १, तर व्यापारी गटात ४ मतांची वाढ झाली आहे. बेदाण्याची कोट्यवधीची उलाढाल आणि तालुक्यातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे बाजार समितीवर संचालकपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मोठी ताकद असल्यामुळे या दोन पक्षांकडून बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली असली तरी, आघाडी होण्याच्या बाबतीतही ती दिसून येत आहे. त्यामुळे तीन स्वतंत्र पॅनेल लागणार, की जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्यानुसार आघाडीचे राजकारण होणार, याचे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)