शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तासगाव बाजार समितीत वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

एक आॅगस्टला मतदान : १९०४ मतदार; १९ जागा; राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसचे इच्छुक सरसावले

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु झाली आहे. १९ जागांसाठी निवडणूक होणार असून १९०४ मतदार आहेत. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रावर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या गटाची संयुक्त सत्ता होती. बाजार समितीचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आघाडी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून संचालक मंडळाऐवजी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १० जून ते २४ जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २६ जूनला नामनिर्देशन छाननी, २७ जूनला प्रसिध्दी होणार आहे. १३ आणि १४ जुलैला अर्ज माघारसाठी मुदत आहे. १५ जुलैला उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून १ आॅगस्टला मतदान होणार आहे. २ आॅगस्टला निकाल जाहीर होणार आहे.एकूण १९ जागांसाठी मतदान होणार आहे. सहकारी संस्थांतील ११ पैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७, इतर मागास प्रवर्गासाठी १, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी १ आणि महिला प्रवर्गासाठी २ जागा आरक्षित आहेत. ग्रामपंचायत गटासाठी ४ जागा असून सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमातीसाठी १ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी १ जागा आरक्षित आहे. व्यापाऱ्यांसाठी १, हमाल-तोलाईदारांसाठी १ जागा आहे. कृषी, प्रक्रिया उद्योग मतदार संघासाठी १ जागा आहे. संस्थांत १, तर व्यापारी गटात ४ मतांची वाढ झाली आहे. बेदाण्याची कोट्यवधीची उलाढाल आणि तालुक्यातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्यामुळे बाजार समितीवर संचालकपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपची मोठी ताकद असल्यामुळे या दोन पक्षांकडून बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसकडूनही तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे. राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली असली तरी, आघाडी होण्याच्या बाबतीतही ती दिसून येत आहे. त्यामुळे तीन स्वतंत्र पॅनेल लागणार, की जिल्हा बँकेच्या फॉर्म्युल्यानुसार आघाडीचे राजकारण होणार, याचे चित्रही लवकरच स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)