शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘कोजिमाशि’चे रणांगण : सत्तारुढ-विरोधकांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी बाजी मारली होती पण सभासदांनी दिलेली एकहाती सत्ता राखण्यात सत्तारुढ गट अपयशी ठरला.

राजाराम लोंढे-कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेसाठी (कोजिमाशि) सरांचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्तारुढ गटाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी जागावाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. सत्तारुढ व विरोधकांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. ‘कोजिमाशि’ ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची शिखरसंस्था आहे. या संस्थेची निवडणूक जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मागील निवडणुकीत स्वाभिमानी आघाडी, राजर्षी शाहू आघाडी व परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी बाजी मारली होती पण सभासदांनी दिलेली एकहाती सत्ता राखण्यात सत्तारुढ गट अपयशी ठरला. संचालक मंडळातील अंतर्गत धुसफुसीमुळे सत्तारुढ गटात उभी फूट पडली आणि तेथूनच प्रत्येक निर्णयाला विरोध होऊ लागला. प्रमुख विरोधक शांत असताना सत्तारुढ गट एकमेकांविरोधात न्यायालयापर्यंत गेला. विरोधी परिवर्तन आघाडीचे राजेंद्र रानमाळे यांनी शाहू आघाडीशी जुळवून घेत शाहू-परिवर्तन आघाडीची मोट बांधली. सत्तारुढ गटातून प्रा. जयंत आसगांवकर व बाबा पाटील हे बाहेर पडल्याने सत्तारुढ गटाची ताकद विभागली आहे. काही करून सत्तारुढ गटाला रोखण्यासाठी रानमाळे यांचा विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न आहे. शाहू परिवर्तन आघाडीमध्ये प्रा. आसगांवकर व बाबा पाटील यांना बरोबर घेऊन ‘एकास एक’ असे तगडे आव्हान सत्तारुढ गटासमोर उभे करण्यासाठी रानमाळे प्रयत्नशील आहेत पण त्यामध्ये त्यांना कितपत यश येते हे महत्त्वाचे आहे. इच्छुकांची संख्या व जागावाटपाचा तिढा सोडवताना रानमाळे यांना कसरत करावी लागणार आहे. सत्तारुढ गटात फूट पडल्याने दादासाहेब लाड यांना यावेळी ही निवडणूक तशी सोपी राहिलेली नाही पण गेले दोन वर्षे विरोधकांची खेळी ओळखून, ‘एकास एक’ आव्हान गृहीत धरूनच त्यांनी जिल्ह्णातील शाळांची गोळाबेरीज सुरू केली आहे. पण त्यांना पॅनेल बांधताना भाकरी परतून नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. हीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे.प्रा. आसगांवकर व बाबा पाटील यांनी सत्तारुढ गटातून बाजूला होत सवता सुभा मांडला आहे. ‘लोकशाही आघाडी’च्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. विनाअनुदानित शाळा हे या आघाडीची मुख्य सामर्थ्य असून सत्तारुढ गटातून बाजूला होऊन त्यांच्या कारभारावर थेट हल्ला चढविला ही त्यांची जमेची बाजू आहे. तिन्ही गटांची तयारी पाहता सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी शेवटच्या क्षणी एकास एक लढत देण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. आज होणार प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध‘कोजिमाशि’ची प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर या यादीवर दहा दिवसांत हरकती घेण्यास मुदत आहे. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते.