शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

चुरशीची लढाई; पण वैयक्तिक टीका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:07 IST

मी पाहिलेली व माझ्या आठवणीत राहणारी निवडणूक म्हणजे १९७७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेली शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ...

मी पाहिलेली व माझ्या आठवणीत राहणारी निवडणूक म्हणजे १९७७ मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चुरशीने झालेली शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार दाजिबा देसाई व कॉँग्रेसचे उमेदवार शंकरराव माने यांच्यातील लढत. आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते.त्या काळात कोल्हापूर शहर म्हणजे ‘शेकाप’चा बालेकिल्ला होता. तसेच डाव्या विचारसरणीचे पुरोगामी शहर म्हणूनही याकडे पाहिले जायचे. कोल्हापूर मतदारसंघातील दाजिबा देसाई व शंकरराव माने यांची निवडणूक आपण जवळून पाहिली आहे. त्यावेळी मी अवघ्या विशीत होतो. त्या काळात सध्यासारखी हायटेक प्रचार यंत्रणा नव्हती. प्रचारासाठी रात्ररात्र जागून एक ग्रुप आपल्या भागातील मोक्याच्या जागी असणाऱ्या भिंती निवडत असे. त्यात मीही होतो. स्वत: घरी तयार केलेला चुना, झाडूचा ब्रश करून निवडलेल्या भिंतींवर ‘शेकाप’ लिहून ती जागा आरक्षित केली जायची. त्यानंतर सुंदर अक्षर असलेला कार्यकर्ता या भिंतीवर उमेदवाराचे नाव, चिन्ह काढून त्याखाली ‘कोल्हापूरच्या विकासासाठी यांनाच विजयी करा’ असे लिहीत असे.आणीबाणीनंतरची पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण उत्साही व जोशपूर्ण होते. निवडणूक चुरशीची असली तरी प्रचारामध्ये एक मर्यादा व संयम होता. आजच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे चारित्र्यहनन व वैयक्तिक पातळीवर होणारी टीका, त्या काळात नव्हती. अतिशय सुसंस्कृत व शिस्तबद्ध पद्धतीने उमेदवार व कार्यकर्तेही आपल्या उमेदवारासाठी जिवाचे रान करीत होते. प्रचारसभेतही उमेदवार व प्रमुख वक्ते एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करीत होते. एकमेकांचा उद्धारही करीत नसत. प्रचारात प्रामुख्याने मतदारसंघाचा विकास, महागाईसह, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी कशा सोडविल्या जातील, हे सांगितले जात होते. सध्या प्रचारात विकासाचे मुद्दे कमी व बोचरी टीका जास्त होत आहे. त्या काळात गल्लीगल्लींतून, बोळांतून ‘....यांना निवडून द्या’ अशा घोषणा देत फिरणारा बालचमूही सर्वांचे लक्ष वेधत होता. त्यावेळी पक्षाचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते यांची पक्षनिष्ठा ही वाखाणण्यासारखी होती. ‘जीव गेला तरी चालेल; पण पक्ष बदलणार नाही,’ अशा नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कडवी फौज ही उमेदवाराला ताकद देणारी होती. सध्या कार्यकर्ते व उमेदवारांची पक्षनिष्ठा शोधावी लागते. या काळात दाजिबा देसाई व शंकरराव माने यांच्यातील चुरशीची लढत चांगलीच गाजली. यामध्ये दाजिबा देसाई यांनी १६५ मतांनी विजय मिळविला.अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन