शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

हातकणंगलेत वर्चस्वाची लढाई

By admin | Updated: February 1, 2017 23:55 IST

१७ गावांतील दहा मतदारसंघांमध्ये प्रतिष्ठा : आवाडे, आवळे, हाळवणकर, मिणचेकर आमने-सामने

इचलकरंजी : येथील विधानसभेच्या आजी-माजी मतदारसंघात असणाऱ्या १७ गावांमध्ये कॉँग्रेसमधील आवाडे व आवळे गट आणि आमदार हाळवणकर व आमदार मिणचेकर यांचा राजकीय प्रभाव आहे. या गावांमध्ये जिल्हा परिषदेचे पाच व तालुका पंचायतीचे दहा मतदारसंघ असून, थोड्या फार फरकाने चारही गट येथे कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हातकणंगले तालुक्यातील या ग्रामीण भागात चौघेही वर्चस्वासाठी लढतील, असा जाणकारांचा व्होरा आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सन २००९ पर्यंत शहर वगळता तारदाळ, खोतवाडी, कोरोची, कबनूर, तिळवणी, साजणी, माणगाव, माणगाववाडी, चंदूर, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली, तळंदगे व यळगुड अशी १७ गावे होती. त्यानंतर झालेल्या पुनर्रचनेत इचलकरंजी व चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी, तारदाळ या गावांचा विधानसभा मतदारसंघ झाला. या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये इचलकरंजी व वडगाव या दोन्ही मतदारसंघांत त्यावेळी असलेले विधानसभा सदस्य प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. वडगावमध्ये डॉ. सुजित मिणचेकर व इचलकरंजीमध्ये सुरेश हाळवणकर निवडून आले.अशा या १७ गावांमध्ये आवाडे, आवळे, हाळवणकर व मिणचेकर या चौघांनाही मानणारे त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे या चौघांच्या गटाचे अस्तित्व त्या ठिकाणी आहे. या १७ गावांत जिल्हा परिषदेचे पाच व तालुका पंचायत समितीचे दहा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजी शहराच्या प्रभावामुळे आणि जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून या १७ गावांत माजी मंत्री आवाडे व आमदार हाळवणकर यांचे गट ताकदीचे मानले जातात. ग्रामीण परिसरामध्ये कॉँग्रेसला गळती लागली असून, अनेक लहान-मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात कॉँग्रेसचा प्रभाव कमी होत असून, भाजपचा प्रभाव म्हणजेच पर्यायाने आमदार हाळवणकरांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे. आता प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. कॉँग्रेसकडून आवाडे गटाच्या समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही, तर एका आघाडीची नोंदणी केली आहे आणि या आघाडीच्या अधिपत्याखाली या १७ गावांत आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुद्धा आवाडे गटाने केली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आणि आपल्या गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आवाडे, हाळवणकर, आवळे व मिणचेकर या चारही गटांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (प्रतिनिधी)