शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविणार

By admin | Updated: December 30, 2015 01:09 IST

संदीप बिष्णोर्ई : ‘भारत राखीव बटालियन’ला जागा देण्यास रेंदाळ, दिंडनेर्ली ग्रामस्थांचा विरोध, बैठक निष्फळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन ३’च्या प्रशासनाने रेंदाळ (ता. हातकणंगले) व दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. या जागेसंदर्भात राज्य राखीव बटालियनचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास तीव्र विरोध केल्याने बिष्णोई यांची अंतिम बैठक निष्फळ ठरली. जागेअभावी ही बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविण्याचा निर्णय आता भारत राखीव बटालियनच्या प्रशासनाने घेतला असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण होऊन मुख्यालय उभारणीस उशीर होत आहे. यासाठी रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार बटालियनच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये प्राधान्याने २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. परंतु दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास विरोध केला होता. दरम्यान, या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई मंगळवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध असल्याचे सांगितले. तसेच रेंदाळ हे भविष्यात नगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहे. येथील लोक भूमिहीन झाले आहेत. अनेक गिरण्यांनी ही जागा व्यापली आहे. बटालियनला जागा दिल्यास गावाचे कार्यक्षेत्र संपुष्टात येणार आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे , बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे व अधिकारी उपस्थित होते. जागेचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांनी भारत राखीव बटालियनला जागा देण्यास शेवटपर्यंत विरोध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बटालियन प्रशासनाकडून आता जिल्ह्णात कोठेही शासकीय गायरानामधील जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली जाणार आहे. त्यांनी यामध्ये मार्ग काढला नाही तर ही बटालियन जेथे जागा उपलब्ध होईल त्या जिल्ह्णात हलविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी यावेळी सांगितले. रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांना बटालियनचे मुख्यालय बांधल्यानंतर गावाला त्याचा काय फायदा होणार, हे सांगितले होते; परंतु त्यांनी बटालियनला जागाच द्यायची नाही, असे सांगितले. त्यांना ‘शेवटची संधी देतो, तुमचा निर्णय विचार करून सांगा,’ अशी विनंतीही केली होती; परंतु त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. आता कोल्हापुरात जागा उपलब्ध होत नसेल तर राज्यात अन्यत्र ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, तिथे ही बटालियन हलविण्यात येईल. संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस महासंचालक,राज्य राखीव पोलीस बल