शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविणार

By admin | Updated: December 30, 2015 01:09 IST

संदीप बिष्णोर्ई : ‘भारत राखीव बटालियन’ला जागा देण्यास रेंदाळ, दिंडनेर्ली ग्रामस्थांचा विरोध, बैठक निष्फळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन ३’च्या प्रशासनाने रेंदाळ (ता. हातकणंगले) व दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. या जागेसंदर्भात राज्य राखीव बटालियनचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास तीव्र विरोध केल्याने बिष्णोई यांची अंतिम बैठक निष्फळ ठरली. जागेअभावी ही बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविण्याचा निर्णय आता भारत राखीव बटालियनच्या प्रशासनाने घेतला असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण होऊन मुख्यालय उभारणीस उशीर होत आहे. यासाठी रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार बटालियनच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये प्राधान्याने २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. परंतु दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास विरोध केला होता. दरम्यान, या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई मंगळवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध असल्याचे सांगितले. तसेच रेंदाळ हे भविष्यात नगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहे. येथील लोक भूमिहीन झाले आहेत. अनेक गिरण्यांनी ही जागा व्यापली आहे. बटालियनला जागा दिल्यास गावाचे कार्यक्षेत्र संपुष्टात येणार आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे , बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे व अधिकारी उपस्थित होते. जागेचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांनी भारत राखीव बटालियनला जागा देण्यास शेवटपर्यंत विरोध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बटालियन प्रशासनाकडून आता जिल्ह्णात कोठेही शासकीय गायरानामधील जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली जाणार आहे. त्यांनी यामध्ये मार्ग काढला नाही तर ही बटालियन जेथे जागा उपलब्ध होईल त्या जिल्ह्णात हलविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी यावेळी सांगितले. रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांना बटालियनचे मुख्यालय बांधल्यानंतर गावाला त्याचा काय फायदा होणार, हे सांगितले होते; परंतु त्यांनी बटालियनला जागाच द्यायची नाही, असे सांगितले. त्यांना ‘शेवटची संधी देतो, तुमचा निर्णय विचार करून सांगा,’ अशी विनंतीही केली होती; परंतु त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. आता कोल्हापुरात जागा उपलब्ध होत नसेल तर राज्यात अन्यत्र ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, तिथे ही बटालियन हलविण्यात येईल. संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस महासंचालक,राज्य राखीव पोलीस बल