शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ला १७२ ‘सीएचबी’धारकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:45 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी यंदा १७२ तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचा (सीएचबीधारक) ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी यंदा १७२ तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचा (सीएचबीधारक) आधार घ्यावा लागणार आहे. महाविद्यालयातील पूर्णवेळ प्राध्यापकांची २८ पदे गेल्या १0 वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची भरती व्हावी, यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.महाविद्यालयातील वरिष्ठ अनुदानित विभागासाठी पूर्णवेळ प्राध्यापकांची ५९ पदे मंजूर असून, त्यापैकी १८ रिक्त आहेत. कनिष्ठ अनुदानित विभागामधील मंजूर १९ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमधील वरिष्ठ, कनिष्ठ विभागाकरिता १ : ३ या तत्त्वानुसार सीएचबीधारकांची शैक्षणिक वर्षाकरिता नियुक्ती केली जाते. महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून एम.एस्सी. केमिस्ट्री, एम.ए. गृहशास्त्र, बी. कॉम. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष, बी.एस्सी. अवकाश संशोधन, नॅनो टेक्नॉलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, बी.ए. संगीत अभ्यासक्रम शासन मान्यतेनुसार शिकविण्यात येत आहेत. त्यासाठी सीएचबीधारकांची नियुक्ती केली जाते. कनिष्ठ विभागातील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी अर्धवेळ प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता आहे; त्यामुळे या पदांचे कामदेखील सीएचबीधारकांवर सोपवावे लागत आहे. अर्धवेळ प्राध्यापकांच्या पदावर १:२ याप्रमाणे सीएचबीधारकांची नियुक्ती करण्यात येते. कॉलेजचे शैक्षणिक कामकाज सांभाळण्यासाठी दरवर्षी १६० ते १७० सीएचबीधारकांचा आधार घ्यावा लागत आहे. रिक्त पदे, अर्धवेळ पदांमुळे सध्या कार्यरत पूर्णवेळ प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्त पदांबाबतची ही स्थिती येथील गुणवत्तेला मारक ठरणार आहे.गुणवत्तेवर परिणामरिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून केली जाते; मात्र, एमपीएससीकडून पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सीएचबीधारकांची दरवर्षी नियुक्ती करावी लागते. वर्षागणिक सीएचबीधारकांमध्ये बदल होतो. त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. ते विद्यार्थ्यांसाठी मारक ठरणारे आहे.