शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘राजाराम’ला १७२ ‘सीएचबी’धारकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:45 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी यंदा १७२ तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचा (सीएचबीधारक) ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येथील राजाराम महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी यंदा १७२ तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांचा (सीएचबीधारक) आधार घ्यावा लागणार आहे. महाविद्यालयातील पूर्णवेळ प्राध्यापकांची २८ पदे गेल्या १0 वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची भरती व्हावी, यासाठी महाविद्यालयाकडून सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.महाविद्यालयातील वरिष्ठ अनुदानित विभागासाठी पूर्णवेळ प्राध्यापकांची ५९ पदे मंजूर असून, त्यापैकी १८ रिक्त आहेत. कनिष्ठ अनुदानित विभागामधील मंजूर १९ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमधील वरिष्ठ, कनिष्ठ विभागाकरिता १ : ३ या तत्त्वानुसार सीएचबीधारकांची शैक्षणिक वर्षाकरिता नियुक्ती केली जाते. महाविद्यालयात गेल्या तीन वर्षांपासून एम.एस्सी. केमिस्ट्री, एम.ए. गृहशास्त्र, बी. कॉम. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष, बी.एस्सी. अवकाश संशोधन, नॅनो टेक्नॉलॉजी, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, बी.ए. संगीत अभ्यासक्रम शासन मान्यतेनुसार शिकविण्यात येत आहेत. त्यासाठी सीएचबीधारकांची नियुक्ती केली जाते. कनिष्ठ विभागातील राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी अर्धवेळ प्राध्यापकांच्या नियुक्तीला मान्यता आहे; त्यामुळे या पदांचे कामदेखील सीएचबीधारकांवर सोपवावे लागत आहे. अर्धवेळ प्राध्यापकांच्या पदावर १:२ याप्रमाणे सीएचबीधारकांची नियुक्ती करण्यात येते. कॉलेजचे शैक्षणिक कामकाज सांभाळण्यासाठी दरवर्षी १६० ते १७० सीएचबीधारकांचा आधार घ्यावा लागत आहे. रिक्त पदे, अर्धवेळ पदांमुळे सध्या कार्यरत पूर्णवेळ प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. रिक्त पदांबाबतची ही स्थिती येथील गुणवत्तेला मारक ठरणार आहे.गुणवत्तेवर परिणामरिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून केली जाते; मात्र, एमपीएससीकडून पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. सीएचबीधारकांची दरवर्षी नियुक्ती करावी लागते. वर्षागणिक सीएचबीधारकांमध्ये बदल होतो. त्याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर होतो. ते विद्यार्थ्यांसाठी मारक ठरणारे आहे.