शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

निराधार प्रकल्पग्रस्तांना ‘आधार’

By admin | Updated: January 5, 2015 00:42 IST

पाच लाख मिळणार : जिल्ह्यातील साडेतेरा हजार प्रकल्पग्रस्तांना लाभ

प्रवीण देसाई -कोल्हापूर -इतरांच्या सुखासाठी आपलं सुख विसरून... प्रसंगी आपलं घरदार, जमीन सोडून अन्यत्र अनोळख्या ठिकाणी जाणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या वेदना कुणाही संवेदनशील माणसाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. लढल्याशिवाय काही मिळत नाही, अशी परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे. या प्रकल्पग्रस्तांसाठी गत सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला नाही, त्या कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याचा हा निर्णय आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ हजार ५३८ कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. नव्या सरकारने तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करून प्रकल्पग्रस्तांची बिकट वाट थोडी सोपी करण्याची गरज आहे.ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरातील व्यक्ती नोकरीला नाही, अशा कुटुंबासाठी दहा लाखांची ठेव ठेवून त्याच्या व्याजावर ते कुटुंब चालू शकेल, अशी तरतूद करावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राज्यस्तरावर लढा सुरू होता. पदरच्या जमिनी देऊन नोकरीही नसल्याने कुठंतरी रोजगाराला जाऊन घरगाडा चालविण्याची वेळ धरण व अभयारण्य प्रकल्पग्रस्तांवर येत आहे. गेल्या ३० वर्षांपासून नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, अशा कुटुंबांचे प्रमाण एकूण प्रकल्पग्रस्तांपैकी ९५ टक्के इतके आहे.नोकरी देणे शक्य नसेल, तर ती कुटुंब चालण्यासाठी किमान दहा लाख रुपये प्रतिकुटुंब द्या. ते पैसे ठेव स्वरूपात ठेवून त्याच्या व्याजावर घराला हातभार लागू शकतो, यासाठी प्रकल्पग्रस्तांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला. प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचा प्रसंग आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी याबाबतचा निर्णय न झाल्यास परिणामांची तयारी ठेवा, असा सज्जड इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला. परिणामी, २७ आॅगस्ट २०१४ला तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने ज्या कुटुंबातील व्यक्तींना नोकरी नाही व ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र आहे, त्यांना एकदाच पाच लाख रुपये देण्याचा शासन निर्णय घेतला. प्रकल्पग्रस्तांची दहा लाख रुपयांची मागणी होती. परंतु, सरकारने पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. सरकारने सकारात्मक पाऊल उचलल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील ५१ प्रकल्पांतील १३ हजार ५३८ कुटुंबांना होणार आहे. ही आकडेवारी शासनाची आहे. तरी यामध्ये संकलन दुरुस्ती होण्याची शक्यता असून, आणखीही आकडेवारी वाढणार आहे. गत कॉँग्रेस सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला. परंतु, काही दिवसांतच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर दुर्दैवाने सरकारही बदलले. त्यामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. प्रकल्पग्रस्तांना सध्याच्या भाजप सरकारकडून सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे. १३ हजार ५३८ लाभार्थीपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये कासारी प्रकल्पातील १७०७, दूधगंगा प्रकल्पातील १६२२, आंबेओहोळमधील १२४५, वारणेतील ७४७, कुंभीतील ६६३, चिकोत्रातील ६९९, चांदोलीतील ६९९, पाटणे ३७१ ही मोठी संख्या असलेल्या प्रकल्पांची नावे आहेत. याशिवाय ३५९ पेक्षा कमी लाभार्थी असलेली संख्या जिल्ह्यातील उर्वरित ४२ प्रकल्पांमधील आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ज्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला नाही, अशा प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये द्यावे, अशी मागणी केली जात आहे. याबाबत सरकारने पाच लाख रुपये देण्याचा शासन निर्णय केला आहे. सरकार बदलले असले तरी या नवीन सरकारला या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.- मारुती पाटील, जिल्हाध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल