शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

तुळशी धरण भरण्यास लोंढा प्रकल्पाचा आधार

By admin | Updated: August 8, 2016 23:35 IST

शेतीसाठी वरदान : तुळशीच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात ७७ टक्के पाणीसाठा

 श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोड राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणारा परिसर म्हणजे तुळशी-धामणीचा काठ. या काठावर पावसाळ््याच्या दिवसांत सरासरी एवढा पाऊस होऊनदेखील या परिसराचे ‘वरदान’ असणारा ‘तुळशी’ तलाव गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरू शकलेला नाही. तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार यात कोणतीच शंका नाही. कारण या लोंढा-नाला प्रकल्पातून जादा होणारे पाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात मिसळत असल्याने तलावाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तुळशी तलाव हा या परिसरातील लोकांसाठी वरदान आहे. राधानगरी, करवीरसह पाणी टंचाईच्या काळात इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा करणारा हा तलाव या तुळशी नदी तीरावरील जवळपास ८८५५ एकर क्षेत्र ओलिताखाली आणतो. पण २०१३ पासून मात्र हा तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. परिणामी, या नदीकाठावरील लोकांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना दोन वर्षांत सामोरे जावे लागले. याची उदाहरणे ताजी आहेत. दुसरीकडे १९७६ नंतर देखील फक्त १६ वेळाच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याच्या नोंदी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात केलेल्या पहावयास मिळतात. तुळशी धरणदेखील काहीवेळा पूर्ण क्षमतेने भरू शकत नसल्याच्या कारणास्तव या धरणापासून लगतच तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या ‘बैलगोंड’ ओढ्यावर जर लघुपाटबंधारे प्रकल्प उभा केला, तर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जादा पाणी प्रकल्पाच्या नियोजित उजव्या बाजूच्या सांडव्यातून तुळशी तलावात सोडता येईल व याचा फायदा तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास होईल, या उद्देशाने लोंढा-नाला प्रकल्पाची निर्मिती झाली. २००१ साली डी. सी. पाटील कन्स्ट्रक्शनने या प्रकल्पाचे काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली. १० कोटी ७३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले. पण मध्यंतरी निधीची कमतरता व सक्षम नेतृत्त्वाचा अभाव यामुळे हा लोंढा- नाला प्रकल्पही रखडला आणि लोंढा नाल्याचे पाणी ‘तुळशी’त येण्याची शक्यता थंडावली. प्रकल्पाची ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४यावर्षी लोंढा-नाला प्रकल्पातून अतिरिक्त होणारे पाणी प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात २०० ते ३०० क्युसेक येत असल्याने तुळशी जलाशयाच्या पातळीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. ४सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा असून, आॅगस्टअखेर धरण भरण्याची खात्री पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. असे झाल्यास याचा फायदा तुळशी काठावरील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. ४शासनाने एक चांगला उद्देश ठेवून हा प्रयोग राबवला असून, त्याला यशही आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.