शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

तुळशी धरण भरण्यास लोंढा प्रकल्पाचा आधार

By admin | Updated: August 8, 2016 23:35 IST

शेतीसाठी वरदान : तुळशीच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात ७७ टक्के पाणीसाठा

 श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोड राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणारा परिसर म्हणजे तुळशी-धामणीचा काठ. या काठावर पावसाळ््याच्या दिवसांत सरासरी एवढा पाऊस होऊनदेखील या परिसराचे ‘वरदान’ असणारा ‘तुळशी’ तलाव गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरू शकलेला नाही. तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार यात कोणतीच शंका नाही. कारण या लोंढा-नाला प्रकल्पातून जादा होणारे पाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात मिसळत असल्याने तलावाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. तुळशी तलाव हा या परिसरातील लोकांसाठी वरदान आहे. राधानगरी, करवीरसह पाणी टंचाईच्या काळात इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा करणारा हा तलाव या तुळशी नदी तीरावरील जवळपास ८८५५ एकर क्षेत्र ओलिताखाली आणतो. पण २०१३ पासून मात्र हा तलाव एकदाही पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. परिणामी, या नदीकाठावरील लोकांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना दोन वर्षांत सामोरे जावे लागले. याची उदाहरणे ताजी आहेत. दुसरीकडे १९७६ नंतर देखील फक्त १६ वेळाच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याच्या नोंदी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात केलेल्या पहावयास मिळतात. तुळशी धरणदेखील काहीवेळा पूर्ण क्षमतेने भरू शकत नसल्याच्या कारणास्तव या धरणापासून लगतच तुळशी तलावाच्या दक्षिणेस असणाऱ्या ‘बैलगोंड’ ओढ्यावर जर लघुपाटबंधारे प्रकल्प उभा केला, तर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जादा पाणी प्रकल्पाच्या नियोजित उजव्या बाजूच्या सांडव्यातून तुळशी तलावात सोडता येईल व याचा फायदा तुळशी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास होईल, या उद्देशाने लोंढा-नाला प्रकल्पाची निर्मिती झाली. २००१ साली डी. सी. पाटील कन्स्ट्रक्शनने या प्रकल्पाचे काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली. १० कोटी ७३ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले. पण मध्यंतरी निधीची कमतरता व सक्षम नेतृत्त्वाचा अभाव यामुळे हा लोंढा- नाला प्रकल्पही रखडला आणि लोंढा नाल्याचे पाणी ‘तुळशी’त येण्याची शक्यता थंडावली. प्रकल्पाची ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ४यावर्षी लोंढा-नाला प्रकल्पातून अतिरिक्त होणारे पाणी प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात २०० ते ३०० क्युसेक येत असल्याने तुळशी जलाशयाच्या पातळीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. ४सध्या धरणात ७७ टक्के इतका पाणीसाठा असून, आॅगस्टअखेर धरण भरण्याची खात्री पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. असे झाल्यास याचा फायदा तुळशी काठावरील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. ४शासनाने एक चांगला उद्देश ठेवून हा प्रयोग राबवला असून, त्याला यशही आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.