शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वटवाघळांवर काळरात्र--वळवाने उडवली दैना जिल्ह्यात साडेबारा लाखांचे नुकसान

By admin | Updated: May 7, 2015 00:38 IST

पर्यावरणप्रेमी सरसावले : ९३ वटवाघळांचा मृत्यू; शेकडोंना जीवदान

कोल्हापूर : वादळी पावसामुळे टाउन हॉल येथील पिंपळाच्या झाडाची फांदी मंगळवारी रात्री तुटून जमिनीवर पडली. त्यामुळे या फांदीवर विसावलेल्या ९३ वटवाघळांचा जमिनीवर आपटून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उद्यानात फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व सजग नागरिकांना समजली. त्यांनी तत्काळ पडलेल्या एकेक वटवाघळाला परत झाडावर उडविण्याचा प्रयत्न केला. यात काही वटवाघळे पुन्हा झाडावर विसावली, तर ९३ वटवाघळांचा खाली पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. बुधवारी सकाळी टाऊन हॉल बागेत वटवाघळे मृत झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी तत्काळ वन विभाग व अग्निशमन दलाला ही बाब कळविली. मात्र, नेहमीप्रमाणे वन विभागाचे कर्मचारी वेळाने आले, तर अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. वटवाघळे सस्तन, निशाचार पक्षी असल्याने त्यांना फक्त रात्रीचे दिसते. त्यामुळे ती तशीच जमिनीवर पडून होती. फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व अग्निशमन दलाच्या जवानांनी दोनशेहून अधिक वटवाघळांना जवळील छोट्या झाडावर सुखरूप नेऊन सोडले; तर अन्य ९३ मृत वटवाघळांना अग्निशमन दल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, करवीरचे वनपाल पी. डी. घोडके, आर. के. देसा यांनी येऊन पाहणी केली; तर वाठार येथील राजू कांबळे हे करवीरचे तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यांनीही अनेक वटवाघळांना सुखरूप दुसऱ्या झाडावर चढविले. दरम्यान, सस्तन पक्षी असलेल्या वटवाघळाचे रक्त गरम असल्याने याचा वापर औषध म्हणून अर्धांगवायू व संधिवातावर केला जातो, या गैरसमजापोटी अनेक वटवाघळे मृत झाल्याचे समजल्यानंतर अनेकजण टाउन हॉल उद्यानात पोती घेऊन आले होते. मृत पडलेल्या वटवाघळांना उचलून पोत्यात घालण्याच्या तयारीत असलेल्या या नागरिकांना पर्यावरणप्रेमी व उद्यान कर्मचारी, वन, अग्निशमन दलाचे जवान यांनी हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचारी व या नागरिकांत वादावादी झाली. कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना पिटाळून लावले. मन पिळवटून टाकणारे दृश्यजमिनीवर आपटल्याने अनेक वटवाघळांचा मृत्यू झाला. यावेळी वटवाघळाच्या पाच माद्या आपल्या पिलांना पंखांखाली घेऊन पडल्याचे दिसून आले. यात मादी पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, पंखांखाली असलेली पाच पिल्ले आईचे दूध पिताना जिवंत दिसून आली. त्यांनाही वाचविण्यात यश आले. १०२ खांब भुईसपाटवीज कंपनीला ‘शॉक’ : कर्मचाऱ्यांनी रात्रभर केले कामअग्निशमन दलाची तारांबळशेकडो फोन : झाडे कोसळण्याची शहरात मालिकाचशहरात पाणीपुरवठा ठप्प; टँकरने पुरवठाबाजार समितीत चिखलातच झाले कांदा सौदे