शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बार, वाईन शॉपला गडकिल्ल्यांची नावे देऊ नयेत : ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बार, परमिट रूम आणि वाईन शॉप यांना गडकिल्ल्यांची नावे देऊ नयेत, यासाठी राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बार, परमिट रूम आणि वाईन शॉप यांना गडकिल्ल्यांची नावे देऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात मागणी करणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. हर्षल सुर्वे यांनी निर्मिती केलेल्या ‘मर्दासारखं वाग जरा...’ हे गाणे शिवजयंतीदिवशी यू ट्यूबवर प्रसारित करण्यात येणाऱ असल्याचे यावेळी सांगितले.

शिवरायांचे गडकिल्ले ही आपली अस्मिता असून, ती जपली पाहिजे. त्यासाठी गडांचे पावित्र्य राखा, असा संदेश ‘मर्दासारखं वाग जरा...’ या साडेतीन मिनिटांच्या गाण्यात दिला आहे. गडकिल्ल्यांवर होणारी ओली पार्टी, अश्लील प्रकार, बार, परमिटरूम आणि वाईन शॉप यांना देण्यात येणारी गडकिल्ल्यांची नावे, याऐवजी गडांकडे शौर्यपीठ, शक्तिस्थान म्हणून पाहावे आणि शिवरायांची अस्मिता जपावी, असा संदेश या गाण्यातून तरुणाईला देण्यात आला आहे.

आमदार ऋतुराज पाटील, हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या गाण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सहकार्य केले आहे. स्वत: हर्षल सुर्वे यांनी प्रथमच हे गाणे गायिले आहे. पन्हाळा आणि पावनगड या किल्ल्यांवर झालेल्या चित्रीकरणात सुमारे ४० स्थानिक कलाकारांचा समावेश आहे. या गाण्याचे लेखन, संगीत, संकलन, छायांकन कोल्हापुरातील तंंत्रज्ञ आणि कलाकारांनी केले असून, मुंबईचे नितीन जाधव यांनी दिग्दर्शन केले आहे.

हे आहेत तंत्रज्ञ, कलाकार

ऐश्वर्य मालगावे हे संगीतकार असून, युवराज पाटील हे गीतकार आहेत. शेखर गुरव यांचे संकलन, चेतन कुंभार यांचे छायांकन, दत्तात्रय जगताप यांची रंगभूषा असून, सुचित पोतदार यांनी पोस्टर, अजय हारुंगले यांचे छायाचित्रण, तर ओंकार झिरंगे यांनी ड्रोनचे व्यवस्थापन केले आहे. निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार, कुलदीप शिंगटे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, अब्दुल रझाक पटेल, अमित अडसूळ यांनी विशेष सहकार्य केले आहे.

जिल्हा नियोजनच्या निधीमधून गडांवर लागणार फलक

गडकिल्ल्यांवर होणाऱ्या गैरवर्तनाला पायबंद बसावा, यासाठी एक नियमावली करण्यात येणार असून, त्यासंदर्भात माहिती देणारे फलक प्रत्येक गडावर लावण्यात येणार आहेत. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध करून देण्याचे ठरविले असल्याची माहिती यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे.

(संदीप आडनाईक)