शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बापू जाधव यांचे आत्मचरित्र राहिले अपूर्ण

By admin | Updated: January 19, 2017 00:54 IST

जिद्दीचा प्रवास : जीवनसंघर्ष ठरेल नव्या पिढीला प्रेरणादायी; तातडीने पूर्ण करून प्रकाशित होणे आवश्यक

कोल्हापूर : ‘सरोज आयर्न’च्या बापू जाधव यांच्या आत्मचरित्राचे लेखन येथील माजी प्राचार्य डी. आर. कोण्णूर यांनी केले आहे; परंतु ते अजून प्रकाशित झालेले नाही. त्याचे थोडे काम अपुरे आहे; परंतु बापू आजारी पडल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. मंगळवारी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने हे आत्मचरित्र तातडीने पूर्ण व्हायला हवे. त्यातून बापूंच्या जिद्दीचा प्रवास नव्या पिढीसमोर येऊ शकेल.कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेत बापूंचे आई-वडील राहत होते. त्यांचे वडील शंकरराव जाधव हे गवंडी काम करत होते; तर आई सोनाबाई या मोलमजुरी करून कुटुंबाला आधार देत होत्या. बापू बारा वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यावेळी बापूंचे कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण झाले. आईला घरखर्चासाठी मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षण सोडले. अत्यंत हलाखीचे जिणे नशिबी आलेल्या बापंूनी कष्टाच्या बळावर आयुष्यच बदलून दाखविले. त्यांना आईबद्दल कमालीचा आदरभाव होता. ‘तिच्यामुळेच आयुष्यात उभा राहू शकलो,’ अशी भावना ते व्यक्त करत.तो काळ साधारणत: सन १९५० चा होता. बापू त्यावेळी मे. पाटोळे-जाधव आणि कंपनीमध्ये हेल्परचे काम करत होते; परंतु त्यांच्यातील जिज्ञासूपणा पाहून त्यांना फौंड्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सिलिंडर हेडचे काम फारच किचकट आणि क्लिष्ट असल्याने कोल्हापुरात त्याची निर्मिती सहसा कोण करत नव्हते. ही संधी ओळखून बापूंनी उद्योग उभारणी करण्याचे ठरविले. भैयासाहेब हुदली यांनी त्यांना संधी दिली. बापूंनी संधीचे सोने करून रिजेक्शनविना सिलिंडर हेड बनवून दाखविले. बापूंना त्यांनी शाब्बासकी म्हणून पाचशे रुपये बक्षीस दिले व स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला तेथून बापचे पाऊल पडले. त्यांनी मागे पाहिलेच नाही.फौंड्री उद्योगाकडे पर्यावरणाला हानीकारक उद्योग म्हणून पाहिले जाते; परंतु बापूंनी सन २००७ मध्ये ‘भारतातील पहिला सँड रिक्लेमेशन प्लँट’ कॅनडा येथून आयात करून स्वत:च्या सरोज आयर्नमध्ये बसविला. त्यामुळे या कंपनीच्या सर्व फौंड्रीज या ‘ग्रीन फौंड्रीज’ म्हणून ओळखल्या जातात.पाच नाजूक बोटे...बापूंनी सन १९७३ मध्ये बाबा कदम यांच्या कादंबरीवर आधारित ‘पाच नाजूक बोटे’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता; परंतु त्यात अपयश आल्यावर त्यांनी वेळेतच हे क्षेत्र सोडले. ४त्यांना नाटक व चित्रपटांचे वेड होते. त्यामुळे सोमवारी सुटीदिवशी ते सलग तीन चित्रपट पाहत असत. त्यांना पियानो वाजविण्यातही आनंद वाटत होता.प्रामाणिक करदाताबापंूच्या आयुष्यभराच्या जडणघडणीचा कष्ट आणि प्रामाणिकपणा हा पाया होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यवहारातही कायम पडले. कामगारांशी ते स्वत:च्या मुलांप्रमाणे वागत. त्यांच्या सुख-दु:खांत सहभागी होत. उद्योजक म्हणून सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे ते भरत असत. आयकर विभागातर्फे त्यांचा त्याबद्दल एकदा सत्कारही झाला होता. असे करणे म्हणजेच खरी देशसेवा असते, असे ते मानत असत.