शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

बापू जाधव यांचे आत्मचरित्र राहिले अपूर्ण

By admin | Updated: January 19, 2017 00:54 IST

जिद्दीचा प्रवास : जीवनसंघर्ष ठरेल नव्या पिढीला प्रेरणादायी; तातडीने पूर्ण करून प्रकाशित होणे आवश्यक

कोल्हापूर : ‘सरोज आयर्न’च्या बापू जाधव यांच्या आत्मचरित्राचे लेखन येथील माजी प्राचार्य डी. आर. कोण्णूर यांनी केले आहे; परंतु ते अजून प्रकाशित झालेले नाही. त्याचे थोडे काम अपुरे आहे; परंतु बापू आजारी पडल्याने ते पूर्ण होऊ शकले नाही. मंगळवारी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने हे आत्मचरित्र तातडीने पूर्ण व्हायला हवे. त्यातून बापूंच्या जिद्दीचा प्रवास नव्या पिढीसमोर येऊ शकेल.कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेत बापूंचे आई-वडील राहत होते. त्यांचे वडील शंकरराव जाधव हे गवंडी काम करत होते; तर आई सोनाबाई या मोलमजुरी करून कुटुंबाला आधार देत होत्या. बापू बारा वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यावेळी बापूंचे कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण झाले. आईला घरखर्चासाठी मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी शिक्षण सोडले. अत्यंत हलाखीचे जिणे नशिबी आलेल्या बापंूनी कष्टाच्या बळावर आयुष्यच बदलून दाखविले. त्यांना आईबद्दल कमालीचा आदरभाव होता. ‘तिच्यामुळेच आयुष्यात उभा राहू शकलो,’ अशी भावना ते व्यक्त करत.तो काळ साधारणत: सन १९५० चा होता. बापू त्यावेळी मे. पाटोळे-जाधव आणि कंपनीमध्ये हेल्परचे काम करत होते; परंतु त्यांच्यातील जिज्ञासूपणा पाहून त्यांना फौंड्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सिलिंडर हेडचे काम फारच किचकट आणि क्लिष्ट असल्याने कोल्हापुरात त्याची निर्मिती सहसा कोण करत नव्हते. ही संधी ओळखून बापूंनी उद्योग उभारणी करण्याचे ठरविले. भैयासाहेब हुदली यांनी त्यांना संधी दिली. बापूंनी संधीचे सोने करून रिजेक्शनविना सिलिंडर हेड बनवून दाखविले. बापूंना त्यांनी शाब्बासकी म्हणून पाचशे रुपये बक्षीस दिले व स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला तेथून बापचे पाऊल पडले. त्यांनी मागे पाहिलेच नाही.फौंड्री उद्योगाकडे पर्यावरणाला हानीकारक उद्योग म्हणून पाहिले जाते; परंतु बापूंनी सन २००७ मध्ये ‘भारतातील पहिला सँड रिक्लेमेशन प्लँट’ कॅनडा येथून आयात करून स्वत:च्या सरोज आयर्नमध्ये बसविला. त्यामुळे या कंपनीच्या सर्व फौंड्रीज या ‘ग्रीन फौंड्रीज’ म्हणून ओळखल्या जातात.पाच नाजूक बोटे...बापूंनी सन १९७३ मध्ये बाबा कदम यांच्या कादंबरीवर आधारित ‘पाच नाजूक बोटे’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता; परंतु त्यात अपयश आल्यावर त्यांनी वेळेतच हे क्षेत्र सोडले. ४त्यांना नाटक व चित्रपटांचे वेड होते. त्यामुळे सोमवारी सुटीदिवशी ते सलग तीन चित्रपट पाहत असत. त्यांना पियानो वाजविण्यातही आनंद वाटत होता.प्रामाणिक करदाताबापंूच्या आयुष्यभराच्या जडणघडणीचा कष्ट आणि प्रामाणिकपणा हा पाया होता. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यवहारातही कायम पडले. कामगारांशी ते स्वत:च्या मुलांप्रमाणे वागत. त्यांच्या सुख-दु:खांत सहभागी होत. उद्योजक म्हणून सर्व प्रकारचे कर प्रामाणिकपणे ते भरत असत. आयकर विभागातर्फे त्यांचा त्याबद्दल एकदा सत्कारही झाला होता. असे करणे म्हणजेच खरी देशसेवा असते, असे ते मानत असत.