शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाप्पा आले घरी; महापुरातून उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:36 IST

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची ...

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची आतषबाजी आणि आबालवृद्धांच्या चेहºयावर ओसंडून वाहणाºया उत्साहात सोमवारी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. यानिमित्ताने महिन्याभरानंतर महापुराच्या संकटातून सावरलेल्या कोल्हापूरकरांच्या घरादाराला पुन्हा एकदा नवचैतन्य, मांगल्य, सुख-समृद्धीचे तोरण बांधले गेले.लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकरांचा श्रावण महापूर झेलण्यात आणि त्यातून सावरण्यात गेला; पण भाद्रपदमध्ये सहा दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पांनी महापुराचे मळभ दूर करत पुन्हा एकदा आपल्या भक्तांवर सुखाचा वर्षाव केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरास सजविण्यात गुंतलेल्या नागरिकांची सोमवारी पहाटेपासूनच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये भाविकांची आपल्या आवडत्या देवाला घरी नेण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक कुटुंबांनी बाप्पाला घरी नेण्याचा मान घरच्या मुलींना आणि स्त्रियांना दिला.लहान मुले व पुरुषांनी डोक्यावर फरची टोपी, झब्बा परिधान केला होता तर मुलींनी भरजरी पारंपरिक ड्रेस, महिलांनी नऊवारी, सहावारी साडी, केसात गजरा, साजश्रृंगार केला होता. वयोवृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत अवघे कुटुंब डोक्यावर ‘गणपती बाप्पा मोरया’ची पट्टी बांधून, तर कुणी फेटा घालून बाप्पांना आणण्यासाठी तयार झाले होते. त्यामुळे गंगावेस कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर गर्दीने फुलला होता. यावर्षी उपनगरांतही अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे उपनगरांतील नागरिकांची त्याच ठिकाणी सोय झाली. परिणामी कुंभार गल्लीत अपवाद वगळता गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली नाही.पाना-फुलांनी सजलेल्या हातगाड्या, दुचाकी, चारचाकी, बग्गी, रथ अशा विविध प्रकारच्या वाहनांसह वाद्याच्या गजरात चालत बाप्पांना नेणाऱ्यांची संख्या अधिक होती. दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र गर्दी कमी झाली. अधून-मधून कोसळणाºया पावसाच्या सरी झेलत भाविकांनी गणपती बाप्पांना घरी नेले.बाप्पांचा मानमुली, महिलांनागणेशमूर्ती कुटुंबातील पुरुषांनीच आणावी, असा अलिखित नियम आपल्याकडे रूढ आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या विचारसरणीला छेद देत अनेक मुली, महिलांनी बाप्पांचे सारथ्य केले. पारंपरिक वेशभूषेत बाप्पांना स्वहस्ते घरी आणत यानिमित्ताने समानतेचा संदेशच जणू देण्यात आला.रिक्षाचालकांचीमोफत सेवाशहरातील सुमारे २५ रिक्षाचालकांनी गणेशमूर्ती घेतलेल्या भाविकांना मोफत रिक्षासेवा सोमवारी दिवसभर दिली. शहरातील विविध परिसरात त्यांनी सेवा पुरविली. भाविकांनी त्यांचे आभार मानले. या रिक्षाचालकांच्या या सेवेमुळे सामाजिक बंध दृढ झाले.