शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

साखरेची उचल थांबल्याने बँका अडकल्या दुष्टचक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:32 IST

कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत ...

कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत नसल्याने कारखानदारांबरोबरच बँकाही अडचणीत आल्या आहेत. साखर विक्रीतून कारखान्यांकडून येणारे कर्जाचे हप्ते थांबल्याने बँका दुष्टचक्रात अडकल्या आहेत.केंद्र सरकारने साखरेचा किमान दर २९ रुपये केल्याने यंदा साखर उद्योगासमोरील अडचणी कमी होतील, असे वाटत होते. सरकारने साखरेचा दर बांधून दिला, पण त्याबरोबर साखर कारखान्यांना कोटा पद्धत दिली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कोट्याप्रमाणेच साखर विक्री करावी लागत आहे. दिवाळीनंतर साखरेचे मार्केट काहीसे थंड पडते आणि हळूहळू पूर्वपदावर येते; पण यंदा मार्केटमधील परिस्थिती वेगळी दिसत आहे. दिवाळी होऊन दहा-बारा दिवस झाले तरी मार्केट शांतच आहे. नोव्हेंबर महिन्यातील २0 दिवस संपले तरी कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. बाजारात साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गत हंगामातील साखर पोत्यावर जिल्हा बँक, राज्य बॅँकेने कर्ज दिलेले आहे. बँकिंग धोरणानुसार साखर मूल्यांकनाच्या ८५ टक्के कर्ज द्यायचे असले तरी एफआरपी देण्यासाठी काही कारखान्यांना ९० टक्के कर्ज पुरवठा केलेला आहे. मुळात कोटा पद्धत आणि त्यात तेवढ्या साखरेलाही उठाव नसल्याने बँकांकडे परतावा आलेला नाही.सध्या बाजारात २९३० रुपये प्रतिक्ंिवटल दर असला तरी त्या दरानेही कोणी घेईना, अशी परिस्थिती आहे. साखरेची उचल थांबल्याने कारखानदार अडचणीत आले असले तरी बँकाही अधिक दुष्टचक्रात सापडल्या आहेत. वसुलीच होत नसल्याने गाडा पुढे चालवायचा कसा? असा पेच बँकांसमोर आहे.कमी दराने विक्रीची शक्यताकोटा पद्धतीने साखर बाजारात येत असतानाही उठाव व्हायला पाहिजे; पण उठाव होत नाही याचा अर्थ व्यापाºयांना कमी दरात दुसरीकडे साखर उपलब्ध होत असावी असा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.