शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

नोटबंदीचा निर्णय चर्मोद्योगाच्या मुळावर

By admin | Updated: December 23, 2016 00:36 IST

६० टक्के उत्पादन घटले : ७५ टक्के कामगार बेरोजगार

आसिफ कुरणे --कोल्हापूर --नोटाबंदीच्या निर्णयाचा देशातील चर्मोद्योगाला मोठा फटका बसला आहे. चमड्यापासून तयार होणाऱ्या वस्तूच्या उत्पादनात ६० टक्के घट झाल्याने या उद्योगातील ७५ टक्के कामगार बेरोजगार झाल्याचे असोचेमच्या पाहणी अभ्यासात स्पष्ट झाले आहे. चमड्याच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार होतात. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखीच्या व्यवहारावर मर्यादा आल्याचा फटका या उद्योगाला बसला आहे. चेन्नईतील कातडे कमवण्याच्या कारखान्यामध्ये कातडे येण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. आग्रा, कानपूर आणि कोलकाता सारख्या लेदर क्लस्टरमध्ये हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत घसरले असल्याचे असोचेमने आपल्या पाहणी नमूद केले आहे. पाहणी अभ्यासानुसार कसाई लोकांनी रोख रक्कम मिळत नसल्याने मोठ्या उद्योगांना कातडे देणे बंद केले आहे. तसेच वाहतूकदारांना देण्यासाठी रोख रक्कम नसल्याने कातडे वाहतुकीवर व कोळसा नसल्याने बॉयलर विभागावर देखील विपरित परिमाण झाला आहे.गेल्या १५ दिवसात आग्रा, चेन्नई, कानपूर आणि कोलकात्यातील जवळपास १०० कातडी कमावणाऱ्या उद्योगाच्या प्रतिनिधींशी असोचेमने नोटबंदीचा उद्योगावर झालेल्या परिणामाबाबत चर्चा केली. यातील ८५ टक्के लोकांनी नोटबंदीचा चर्मोद्योगाला जबर फटका बसल्याचे मान्य केले. रोकड उपलब्ध होत नसल्याने कच्चा माल, वाहतूक आणि कामगारांना पैसे देण्यात उद्योगांना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांची घट झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्याचप्रमाणे वेळेत आॅर्डर पुर्ण करणे शक्य नसल्याने अनेक आॅर्डरी नाकारल्याचे ६० टक्के प्रतिनिधींनी सांगितले. पुढील काही महिने याचा परिणाम जाणवणार असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी ९ ते १२ महिने लागतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.कोल्हापूरातील परिस्थिती....कोल्हापुरातील चर्मोद्योगासाठी चेन्नईतून चमड्यांचा पुरवठा होतो. तेथे रोखीने व्यवहार करण्याची अनेक वर्षापासूनची पारंपारिक पद्धत आहे. तेथील व्यापारी डीडी, चेक, आॅनलाईन व्यवहाराने चमड्याचा पुरवठा करत नाही. त्याचा मोठा फटका कोल्हापुरातील चर्मोद्योगाला बसला आहे. सध्या येथील ३० टक्के उत्पादन घटले असून ही परिस्थिती येत्या महिन्याभरात आणखी बिकट होणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या चमड्यावर काही दिवस व्यवसाय चालेल पण त्यानंतर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल. नोटबंदीमुळे कातडी उत्पादनाची विक्री ४० टक्क्यांनी घटली आहे.- भूपाळ शेटे, चर्मोद्योजक, कोल्हापूर