शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पूर्व हंगामी कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा

By admin | Updated: June 17, 2016 00:50 IST

साखर कारखान्यांची कोंडी : नजरगहाण माल म्हणून साखर बँकांच्या ताब्यात असल्याने वसुलीसाठी घाई नको

प्रकाश पाटील--कोपार्डे --साखरेचा स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी होत असली तरी उचल मात्र होत नसल्याने साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यातच पूर्व हंगामी कर्ज व व्याज, एफआरपी, नोकर पगार, ओव्हर व्हॅलिंगचे काम यासाठी लागणारा पैसा उपलब्ध कसा करावयाचा हा मोठा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे. यामुळे साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होत आहे.सर्वसाधारण साखर उद्योगाला आजही आपल्या पायावर आर्थिक क्षमता उभारण्यात अपयश आल्याने बँकांच्या कुबड्या घेऊनच उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहे. यात प्रथम कच्चा माल म्हणून ऊस हा शेतकऱ्यांकडून घेतल्यानंतर त्यासाठी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी कायद्याप्रमाणे ‘एफआरपी’ १४ दिवसांच्या आत देण्याचे बंधन आहे. मात्र, ऊस गाळपापासून बनलेली साखर मात्र कारखानदार वर्षभर विकत असतात आणि त्यातून मिळणाऱ्या पिकातून सर्व देणी भागविली जातात. असा एकूण आर्थिक व्यवहार साखर उद्योगात वर्षानुवर्षे चालत आला आहे.यावर्षी पाण्याचा टंचाईने कोल्हापूर व पुणे विभाग वगळता इतर विभागातील कारखाने सुरू होतील का नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती पुढील हंगामात साखर उत्पादनात मोठी घट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने साखर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साखरेला मागणी येत असल्याचे कारखानदारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आज असणारा ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर येत्या काळात ४००० ते ४२०० रुपयांवर जाणार असल्याने कारखानदारांनी व्यापाऱ्यांना साखर देऊन त्यांचा फायदा करण्यापेक्षा गोडावूनमध्येच ठेवण्यास पसंती दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.मात्र, पूर्व हंगामी कर्ज देणाऱ्या बँकांनी कर्ज व व्याज वसुलीसाठी तगादा लावल्याने कारखानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आम्ही उत्पादित केलेल्या साखरेच्या गोडावूनच्या किल्ल्या तुमच्या हातात असताना कर्जाच्या वसुलीची काळजी का? असा सवाल केला जात आहे. आर्थिक फटका बसला गेल्या दीड वर्षात साखरेच्या दराने १९०० रुपयांपर्यंत निच्चांक गाठला होता. यावेळी बँकांनी अर्थपुरवठा करताना हा आराखडा घेतला. मात्र, केंद्र शासनाने साखर निर्यातीचे धोरण जाहीर केल्यानंतर साखरेच्या दराचा आलेख वाढत जाऊन तो सध्या ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. हा दर साखर कारखानदारांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच अचानक केंद्राने निर्यात अनुदान काढून घेतल्याने मोठा आर्थिक फटका कारखानदारांना बसणार आहे.