शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पूर्व हंगामी कर्जवसुलीसाठी बँकांचा तगादा

By admin | Updated: June 17, 2016 00:50 IST

साखर कारखान्यांची कोंडी : नजरगहाण माल म्हणून साखर बँकांच्या ताब्यात असल्याने वसुलीसाठी घाई नको

प्रकाश पाटील--कोपार्डे --साखरेचा स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी होत असली तरी उचल मात्र होत नसल्याने साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यातच पूर्व हंगामी कर्ज व व्याज, एफआरपी, नोकर पगार, ओव्हर व्हॅलिंगचे काम यासाठी लागणारा पैसा उपलब्ध कसा करावयाचा हा मोठा प्रश्न कारखानदारांसमोर उभा राहिला आहे. यामुळे साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होत आहे.सर्वसाधारण साखर उद्योगाला आजही आपल्या पायावर आर्थिक क्षमता उभारण्यात अपयश आल्याने बँकांच्या कुबड्या घेऊनच उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहे. यात प्रथम कच्चा माल म्हणून ऊस हा शेतकऱ्यांकडून घेतल्यानंतर त्यासाठी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी कायद्याप्रमाणे ‘एफआरपी’ १४ दिवसांच्या आत देण्याचे बंधन आहे. मात्र, ऊस गाळपापासून बनलेली साखर मात्र कारखानदार वर्षभर विकत असतात आणि त्यातून मिळणाऱ्या पिकातून सर्व देणी भागविली जातात. असा एकूण आर्थिक व्यवहार साखर उद्योगात वर्षानुवर्षे चालत आला आहे.यावर्षी पाण्याचा टंचाईने कोल्हापूर व पुणे विभाग वगळता इतर विभागातील कारखाने सुरू होतील का नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती पुढील हंगामात साखर उत्पादनात मोठी घट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने साखर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साखरेला मागणी येत असल्याचे कारखानदारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आज असणारा ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर येत्या काळात ४००० ते ४२०० रुपयांवर जाणार असल्याने कारखानदारांनी व्यापाऱ्यांना साखर देऊन त्यांचा फायदा करण्यापेक्षा गोडावूनमध्येच ठेवण्यास पसंती दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे.मात्र, पूर्व हंगामी कर्ज देणाऱ्या बँकांनी कर्ज व व्याज वसुलीसाठी तगादा लावल्याने कारखानदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आम्ही उत्पादित केलेल्या साखरेच्या गोडावूनच्या किल्ल्या तुमच्या हातात असताना कर्जाच्या वसुलीची काळजी का? असा सवाल केला जात आहे. आर्थिक फटका बसला गेल्या दीड वर्षात साखरेच्या दराने १९०० रुपयांपर्यंत निच्चांक गाठला होता. यावेळी बँकांनी अर्थपुरवठा करताना हा आराखडा घेतला. मात्र, केंद्र शासनाने साखर निर्यातीचे धोरण जाहीर केल्यानंतर साखरेच्या दराचा आलेख वाढत जाऊन तो सध्या ३२०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. हा दर साखर कारखानदारांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच अचानक केंद्राने निर्यात अनुदान काढून घेतल्याने मोठा आर्थिक फटका कारखानदारांना बसणार आहे.