शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बेरोजगारांची मान बँकांच्याच तावडीत : अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:19 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना करून कर्जमर्यादा वाढविली खरी परंतु; हे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांतून घ्यायचे असल्याने बेरोजगार तरुणांना या बँका दारात उभ्या करून घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ‘आता आर्थिक वर्षाअखेर असल्याने एप्रिलनंतर या, मग बघू,’ अशी कारणे दिली जात ...

ठळक मुद्देअडीच हजार तरुणांची कर्ज मागणी

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची पुनर्रचना करून कर्जमर्यादा वाढविली खरी परंतु; हे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांतून घ्यायचे असल्याने बेरोजगार तरुणांना या बँका दारात उभ्या करून घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ‘आता आर्थिक वर्षाअखेर असल्याने एप्रिलनंतर या, मग बघू,’ अशी कारणे दिली जात आहेत. ही कर्ज प्रकरणे २ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहेत. त्यासाठी राज्यभरातून २४५० तरुणांनी महामंडळाकडे आॅनलाईन कर्ज मागणी अर्ज दाखल केले आहेत.राज्यात मराठा समाजाचे विराट मोर्चे निघाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या कारभाराकडे सरकारचे लक्ष गेले. या महामंडळाचा कारभार ‘लोकमत’ने वृत्तमालिका लिहून चव्हाट्यावर मांडल्यावर सरकारने कर्ज योजनांची व उत्पन्नाचीही मर्यादा वाढविली. कर्जप्रकरणे दि. २ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केले होते.

त्यानुसार खरेच ही प्रकरणे सुरू झाली का आणि त्याचा तरुणांना कितपत लाभ होतो; याची चौकशी ‘लोकमत’ने केली. तरुणांनी अर्ज तरी दाखल केले आहेत; परंतु बँकांतून प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या कर्जप्रकरणांत महामंडळाची भूमिका फक्त अर्जदाराचा प्रस्ताव बँकांकडे पाठविणे व त्यावरील १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज देण्यापुरतीच आहे. प्रत्यक्षात कर्जपुरवठा बँका करणार आहेत; परंतु या बँकांना अजून या कर्जप्रकरणांबाबत सूचना नाहीत शिवाय अशा महामंडळांकडून दिली जाणारी कर्जे वसूल होत नाहीत,अशी बँकांची धारणा असल्याने ते बेरोजगार तरुणांचे अर्ज हातात घ्यायला तयार नाहीत, असा अनुभव काही तरुणांनी व महामंडळाच्या जबाबदार सूत्रांनीही सांगितला.

व्यक्तिगत कर्ज योजनेतून १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. महामंडळाकडे कर्ज मागणीचा अर्ज आॅनलाईन भरल्यानंतर लगेच लेटर आॅफ इंटेट तयार होते व ते घेऊन राष्ट्रीयीकृत बँकेकडे जायचे व त्यांना प्रकल्प अहवाल सादर करायचा. त्यानंतर बँक त्यास कर्ज द्यायचे की नाही हे ठरविणार आहे. गट प्रकल्प योजनेतून ५० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. तिसºया योजनेत १० लाखांपर्यंतचे कर्ज शेतकरी उत्पादक गटासाठी महामंडळ आपल्या निधीतून देणार आहे; परंतु त्यासाठी या गटाची नोंदणी कंपनी अ‍ॅक्ट २०१३ नुसार होणे बंधनकारक आहे. महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयातून शेवटचे कर्ज प्रकरण २०१६ मध्ये पावणेदोन लाख रुपयांचे मंजूर झाले आहे.मानसिकता अशीकोल्हापुरात भवानी मंडपात या महामंडळाचे कार्यालय आहे. तिथे समन्वयक बसतात; परंतु तिथे माहिती घ्यायला येणाºया तरुणांना त्यांच्या समोर उभे राहून माहिती घ्यावी लागते. कारण तिथे खुर्च्या बसतील एवढी जागाच ठेवलेली नाही. तिथे महामंडळाचा कोणताही फलक नाही. त्यातून सरकार महामंडळाच्या कारभाराबद्दल किती सजग आहे हे ध्यानात येतेच शिवाय मानसिकताही दिसून येते.जिल्हा समन्वयकमहामंडळाच्या कर्ज प्रकरणांबद्दल तरुणांना माहिती देण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याात जिल्हा समन्वयकाची ११ महिन्यांच्या कराराने भरती केली आहे.