शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यासह शहर, तालुक्यातही प्रवेशबंदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्याने रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे, त्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला वगळले असले तरीही नागरिकांना जिल्हा प्रवेशबंदी व फिरण्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांना तालुक्याबाहेरही फिरता येणार नाही. तालुकास्तरावरही पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूर व इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष ठेवून तेथील नागरिकांनाही एक किलोमीटर अंतराबाहेर वस्तू खरेदीसाठी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.

तालुका प्रवेशाला बंदी

जिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाण्यावर प्रतिबंध राहणार आहे. त्यासाठी तालुका तहसील कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर ग्रामीण व्यक्तीला येण्यासही प्रतिबंध केला आहे. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

एक कि.मी. अंतराबाहेर आढळल्यास कारवाई

नागरिकांना अत्यावश्यक सुविधा या एक कि.मी. अंतरापर्यंत उपलब्ध आहेत. त्याच्या कारणास्तव एखादी व्यक्ती एक कि.मी. अंतराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्या रहिवासी ठिकाणाची शहानिशा करून त्याच्यावर वाहन जप्ती, दंड, गुन्हे दाखल व जागीच ॲन्टिजेन चाचणीची कारवाई करण्यात येणार आहे.

आता ‘इव्हिनिंग वॉक’वरही कारवाई

पोलीस खात्यामार्फत रोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांवर कारवाई सुरू आहे. पण आता ‘इव्हिनिंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या सर्वांवरच कारवाई करण्यात येणार आहे. रात्रीच्यावेळी जेवणानंतर घराबाहेर ग्रुपने एकत्र बसणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सायंकाळी अगर रात्री उशिराही बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलीस खात्यामार्फत केले.

आंतरजिल्हा नाकाबंदीची ठिकाणे

कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदीच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाका तसेच सांगली रोडवरील अंकली पूल, आंबा (ता. शाहूवाडी), शिनोळी (ता. चंदगड), राधानगरी, गवसे (आजरा) या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असतील. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्ताची विभागणी केली आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष

कोल्हापूर शहरात नऊ, तर इचलकरंजी शहरात सहा ठिकाणी कायम पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे. त्याशिवाय बाजारपेठा, भाजी मार्केटच्या बाहेर पोलिसांची तपासणी पथके ठेवण्यात येत आहेत. येथे वस्तू खरेदीसाठी येणारा एक कि.मी. अंतरापेक्षा जादा दूरवरून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

भरारी पथकांत वाढ

कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याने कारवाईसाठी पोलिसांच्या फिरत्या भरारी पथकांची संख्या वाढवली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे मोबाईल व्हॅनही देण्यात आल्या आहेत. प्रत्येक भरारी पथकासोबत महानगरपालिकेचा कर्मचारीही असेल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे.

शेतीकामासाठी व मालवाहतूक परवाना

शेतीकामासाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. त्यासाठी शेतीकामाचे कारण बंदोबस्तावरील पोलिसांना पटवून दिले पाहिजे. त्याशिवाय मालवाहतुकीला परवानगी आहे.

अत्यावश्यक कारणांसाठीच परवाना...

घरात अगर नात्यात कोणी मृतक अथवा मृतक विधीसाठी जाणार असेल तर, रुग्णालयात पेशंटला नेण्यासाठी अगर अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेर फिरण्यास परवानगी दिलेली आहे.