शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST

गेल्या वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दमदार हजेरी लावली. या पावसाने सुकू लागलेल्या खरीप पिकांना ...

गेल्या वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दमदार हजेरी लावली. या पावसाने सुकू लागलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाच्या हजेरीने शेतकरी आनंदी झाला आहे.

धामणी खोरा ( ता.पन्हाळा )परिसरात गेले वीस दिवस पावसाने दडी मारल्याने पिके वाळू लागली होती.सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने टोकण केलेल्या भाताची उगवण चांगली झाली. पण अचानक पाऊस गायब झाल्याने पिके पिवळी पडू लागली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय यांची चिंता शेतकऱ्यांना लागली होती तसेच पाण्याअभावी माळरानातील भात रोप लागणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन पावसाची प्रतीक्षा करत होता.

दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पण पाऊस हुलकावणी देत होता. रविवारी रात्री नऊ वाजता पावसाने दमदार सुरूवात केली. पावसाची संततधार अशीच राहिली तर खोळंबलेल्या रोप लागणीच्या कामाला गती येणार आहे.