शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

आभाळाच्या छायेखाली बळीराजा गाळतोय घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर: बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळामुळे आज शुक्रवारपासून तीन दिवस जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा हवामान खात्याचा अंदाज आल्यानंतर शेत-शिवारात एकच ...

कोल्हापूर: बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळामुळे आज शुक्रवारपासून तीन दिवस जिल्ह्यात पाऊस बरसेल, असा हवामान खात्याचा अंदाज आल्यानंतर शेत-शिवारात एकच धांदल उडाली आहे. भरून येणाऱ्या ढगांमुळे ऊन-सावल्यांच्या खेळात आभाळाच्या छायेत बळीराजा दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत घाम गाळताना दिसत आहे. त्यात कोरोना निर्बंधामुळे ११च्या आत शेतीसेवा केंद्र गाठून रांगेत उभे राहून बियाणे खरेदी करताना फुकटचा त्रास सोसावा लागत आहे.

जिल्ह्यात संपूर्ण मे महिन्यात वादळी पावसाने पाठ सोडलेली नाही. याचा उन्हाळी पिकांच्या काढणीत व्यत्यय असला, तरी ऊन पडेल तसे सुगी साधण्यात शेतकरी व्यस्त आहे. पावसामुळे खरिपासाठीची मशागतीची कामेही बऱ्यापैकी पूर्ण झाली असून, रोहिणीच्या मुहूर्तावर धूळवाफ पेरण्यांना सुरुवात देखील झाली आहे. मशागतीसह बांधबंदिस्तीचीही कामेही अंतिम टप्प्यात आहेत.

माॅन्सून १० जूनला कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून आला आहे. आता पेरण्या करून ठेवल्या की, वादळी पावसाच्या पाण्यावर उगवण होते, त्यानंतर माॅन्सून सुरू झाला की वाढही चांगली होते असा पारंपरिक अंदाज गृहीत धरून पेरण्या आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. पण, मजूर आणि बियाणे टंचाईने शेतकरी घाईला आला आहे. त्यातच कोरोना निर्बंधामुळे सकाळी ११ पर्यंतच दुकाने उघडी राहत असल्याने दुकानाजवळ पोहोचताना शेतकऱ्यांची दमछाक उडत आहे. तेथेही लांबलचक रांगा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या दिवसभराच्या नियोजनाचे बाराच वाजत आहेत.

पेरणीसाठी घाई नको

माॅन्सून १० जूनपर्यंत कोकणात येणार असला, तरी महाराष्ट्र व्यापण्यास २५ जून उजाडणार आहे. या कालावधीत पावसाचा फारसा जोर असणार नाही. त्यामुळे ७० ते १२० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर वाढला नाही, तर दुबार पेरण्यांची वेेळ येऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडे दमाने घ्यावे असे आवाहन केले जात आहे, पण तरीदेखील ज्यांची सिंचनाची सोय आहे, ते पेरणीचे धाडस करू लागले आहेत.

आजपासून पुन्हा पाऊस

‘यास’ या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आज शुक्रवारपासून रविवारपर्यंत कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. साधारपणे २ जूनपर्यंत असेच पावसाळी वातावरण राहणार आहे.

फोटो: २७०५२०२१-कोल-बियाणे

फोटो ओळ: माॅन्सूनची चाहूल आणि वादळी पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी केली. कोरोना निर्बंधामुळे सोशल डिस्टन्स राखून रांगेत उभे राहावे लागत असल्याने दुकानांसमोर अशा लांबलचक रांगा दिसत होत्या. (छाया: आदित्य वेल्हाळ)