शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महोत्सवात बालचंदर, चौगुले यांना आदरांजली

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय.

कोल्हापूर : तिसऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक के. बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, सदस्य मनीष राजगोळकर, परीक्षक अशोक राणे, रफीक बगदादी, संस्कार देसाई उपस्थित होते. येथील शाहू स्मारक भवन परिसरात तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामध्ये बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. आदरांजली वाहताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे म्हणाले, शंभराहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन बालचंदर यांनी केले. यामध्ये व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांचाही समावेश होता. समांतर चित्रपटातून त्यांनी सामाजिक आशय आणि आशयघन विषयाची कास कधी सोडली नाही. प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय. बालचंदर यांनी दिग्दर्शनासोबतच निर्मिती, लेखन, अभिनय, पटकथा लेखन, निवेदक याबरोबरीने विनोदी भूमिकाही पार पाडल्या. रामचंद्रन यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी, जयाप्रदा, प्रकाश राज या कलाकारांना पहिली संधी दिली, अशी माहिती राणे यांनी दिली.बेळगावमध्ये १९८३ पासून फिल्म सोसायटीची स्थापना करून ती आजअखेर चालू ठेवण्याचे काम करणारे फिल्म क्लबचे कार्यकर्ते सुभाष बसाप्पा चौगुले यांनाही या महोत्सवात आदरांजली वाहण्यात आली. सुभाष चौगुले हे स्थापनेपासून बेळगावातील अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष होते. कर्नाटक चलचित्र अकादमीचेही ते सदस्य होते. त्यांच्यामुळेच बेळगावमध्ये फिल्म क्लबला चालना मिळाल्याचे कोल्हापूर चित्रपट महोत्सवाचे सचिव दिलीप बापट यांनी सांगितले. महोत्सवात काही सेकंद मौन पाळून चित्रपटगृहातील रसिकांनी बालचंदर तसेच सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहली. (प्रतिनिधी)परीक्षकांचा सन्मानमहोत्सवात माय मराठी विभागात दाखविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या अशोक राणे, रफीक बगदादी आणि संस्कार देसाई या तिघांचा या महोत्सवामध्ये अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.