शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे उद्या उद्घाटन

By admin | Updated: April 1, 2016 01:24 IST

ज्योत्स्ना शिंदे : अभियानासाठी पाच लाख २२ हजारांची तरतूद

कोल्हापूर : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या अभियानाअंतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार निधीची तरतूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.राजाराम कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, शिक्षण आयुक्त (पुणे) डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिक्षण संचालक नामदेवराव जरग, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.शिंदे म्हणाल्या, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची गळती टप्प्याटप्प्याने विहीत कालावधीत कमी करणे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण २०२० पर्यंत शून्य टक्क्यांवर आणणे, माध्यमिक शाळांतील दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे कमाल प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत विहीत कालावधीमध्ये खाली आणणे, माध्यमिक स्तरावर नववीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादन क्षमतांचा शोध घेऊन त्यामध्ये वाढ करणे, नववीच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावविषयक जाणीवजागृती निर्माण करणे, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शाळांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करणे, असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, एस. बी. पाटील, एस. ए. शेख, ए. एम. आकुर्डेकर, आर. व्ही. कांबळे, एस. के. यादव, आर. वाय. पाटील, यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षितया अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सहकार्यामुळे सन २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार इतक्या निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.