शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे उद्या उद्घाटन

By admin | Updated: April 1, 2016 01:24 IST

ज्योत्स्ना शिंदे : अभियानासाठी पाच लाख २२ हजारांची तरतूद

कोल्हापूर : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान व ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या अभियानाअंतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार निधीची तरतूद केल्याचे शिंदे यांनी सांगितले.राजाराम कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, शिक्षण आयुक्त (पुणे) डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिक्षण संचालक नामदेवराव जरग, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.शिंदे म्हणाल्या, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची गळती टप्प्याटप्प्याने विहीत कालावधीत कमी करणे, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण २०२० पर्यंत शून्य टक्क्यांवर आणणे, माध्यमिक शाळांतील दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे कमाल प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत विहीत कालावधीमध्ये खाली आणणे, माध्यमिक स्तरावर नववीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादन क्षमतांचा शोध घेऊन त्यामध्ये वाढ करणे, नववीच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावविषयक जाणीवजागृती निर्माण करणे, उपक्रमशील व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शाळांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कौतुक करणे, असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे, एस. बी. पाटील, एस. ए. शेख, ए. एम. आकुर्डेकर, आर. व्ही. कांबळे, एस. के. यादव, आर. वाय. पाटील, यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षितया अभियानासाठी ११ लाख ६५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सहकार्यामुळे सन २०१५-१६ या वर्षासाठी पाच लाख २२ हजार इतक्या निधीची तरतूद केल्याचे सांगण्यात आले.