शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

भेंडवडेतील बागडी समाज पुराने विवंचनेच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी, गावोगावी हातगाडा ढकलत भंगार गोळा करणारे...भांड्याला कलई करून चकाकी देत...सुई धागा ...

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी, गावोगावी हातगाडा ढकलत भंगार गोळा करणारे...भांड्याला कलई करून चकाकी देत...सुई धागा टोपलीत घेऊन पायपीट करीत पै अन्‌ पैची पुंजी जमवीत, वासुदेव आला रे वासुदेव आला, हे लोकगीत परिसरातील गावात सादर करीत सण-संस्कृतीचा महिमा गात, नदीच्या पाण्यात जीव धोक्यात घालून बेभरवशाची मच्छिमारी करत दारिद्र्याचे ओझे पाठीवर घेऊन जीवन प्रवास करणारा भेंडवडे (ता.हातकणंगले)येथील वासुदेव बागडी समाज महापुराच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झाला आहे. गेल्यावेळच्या महापुरातून सावरायच्या आत पुन्हा संसार वाहून गेल्याने हा समाज पुरता हबकून गेला आहे.

वारणा नदीच्या काठी भेंडवडे हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पश्चिमेस या समाजाची वस्ती असून, साध्या दगड-विटांच्या, पाला चिपडाच्या छोट्या छोट्या घरात ते राहत आहेत. अनेक गैरसोयींची येथे गर्दीच आहे. विकासाची पहाट कधी उगवेल, याच विवंचनेत हा समाज दररोज दिवस ढकलत आहेत. त्यांच्यावरच महापुराच्या संकटाने मोठे आक्रमण केले.

अनपेक्षितरीत्या दोनच दिवसात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. हातात लागेल, पाठीवर बसेल तेवढे साहित्य घेऊन ही माणसं घरातून बाहेर पडली. सोबत दावणीची जनावरं घेतली. वसाहतीतील शाळेत व नरंदे येथील नरंदे हायस्कूलच्या शाळेत मुक्कामास गेली. अख्या वस्तीतील ९० कुटुंबांवर ही स्थलांतराची वेळ आली.

विशेष म्हणजे संपूर्ण गावाला पाण्याने वेढा दिला. ५५० कुटुंबातील २३५० लोकांचे व ८५० जनावरांचे स्थलांतर झाले. सर्वजण सुखरूप गावच्या बाहेर पडलीत.

गतवेळच्या महापुराची अनुभूती पाठीशी असल्याने उद्‌ध्वस्ततेचे चित्र त्यांच्यासमोर उभे राहिले; पण पर्याय नव्हता. अखेर तेच वास्तवात येत पुन्हा कसं उभं राहायचं, या चक्रात ते अडकले आहेत.

चार दिवसांच्या मुक्कामानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. चेहऱ्यावरची चिंतेची मळभ दूर सारीत गावकरी एकमेकांच्या साथीने घराच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी दबकत दबकत चालू लागलीत.

भिंतींना तडा गेल्यात, भिंती ढासळल्यात, घरे कोसळलीत, कपडालत्ता..भांडीकुंडी...अंथरुण पांघरून बेपत्ता झालेत...पुराच्या पाण्यात अनेक जीवापाड जपलेल्या वस्तू वाहून गेल्यात ......सारं काही होत्याचं नव्हतं झाल्याचे वास्तव घराच्या आत-बाहेर आता पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.

गावात, गल्लीत, घरात सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. चिखलाची दलदल, घाणीचे साम्राज्य, आजाराचे दिव्य जणू समोर ठाकले आहे.

पूर ओसरल्यानंतर घरी परतल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा आता पुढे काय होणार, याने भेदरलेला दिसत आहे. हा पूर ग्रामस्थांच्या जीवनाचा सूरच उलटा करणारा ठरला आहे.

फोटो ओळी-१)भेंडवडे येथील छोट्या व्यावसायिकांची खोकी वाहून जाऊन उलटी झाली आहेत. २)भेंडवडे गावात स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतीने मोहीम राबविली आहे. (छाया-आयुब मुल्ला)