शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचा मागासलेपणा धर्मांधतेला पोषक

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

समर खडस : ‘दहशतवाद आणि धर्मांधता’ या विषयावर गुंफले तिसरे पुष्प; दहशतवादाबद्दल चिंता

कोल्हापूर : पाश्चिमात्य देशातील उंच इमारती, झगमगाटातील जीवनशैलीची आपण कल्पना, अनुकरण करतो; पण, डोक्यात विचार मात्र पाकिस्तान, बांग्लादेश अशा देशांचे ठेवतो. या स्वरूपातील विचार हे दहशतवाद, धर्मांधतेला पोषक ठरणारे आहेत. दहशतवाद, धर्मांधता संपविण्यासाठी हे मागास विचार आपण सोडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक समर खडस यांनी गुरुवारी येथे केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प राजकीय विश्लेषक खडस यांनी गुंफले. त्यांचा विषय ‘दहशतवाद आणि धर्मांधता’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कॉ. दिलीप पवार होते.यावेळी खडस म्हणाले, भांडवलशाही व्यवस्था स्वत:च्या फायद्यासाठी एका हातात धर्मांधता आणि दुसऱ्या हातात दहशतवादाचे भूत घेऊन अनेक खेळी करते. वित्तीय दिशेने जाणारी भांडवलशाही सट्टेबाज असते. तिच्या सुरक्षेसाठी धर्मांधता आणि दहशतवाद वाढविला जातो. हिंदू, ज्यू अशा प्रत्येक धर्मात नास्तिकतेची मोठी परंपरा आहे. पण, नास्तिकांना धर्मात स्थान नसले तरी त्यांना समाजात एक विशिष्ट जागा आहे. आज जगभरातील मुस्लिमांमध्ये जो कळीचा प्रश्न आहे, तो माझ्या दृष्टीने त्यांच्यामध्ये नास्तिकतेला जागा नसल्याचा आहे. प्रत्येकाला देव मान्य करण्याचा अथवा न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसा समजा एखादा नास्तिक असेल तर, त्याचा तो अधिकार तुम्हाला मान्य करायला पाहिजे. हा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. ते येथील हिंदुत्ववादी शक्तींना फायदेशीर ठरते. जिथे ‘एमआयएम’ वाढते, तिथे भाजपच्या जागा वाढल्या असल्याचे दिसते. म्हणजे एका धर्मातील कट्टरवाद दुसऱ्या धर्मातील त्याच प्रवृत्तींना खतपाणी घालतो. हे चित्र बदलण्यासाठी देशातील उदारमतवादी मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा.कॉ. दिलीप पवार म्हणाले, दहशतवादाचा उगम राजकीय हस्तक्षेपात आहे. हा हस्तक्षेप निर्माण करण्याची संधी विकसनशील देशांतून मिळते. पहिल्यांदा ते थांबविले पाहिजे. सध्याची देशातील स्थिती पाहता धर्मांधतेला सरकारचे बळ आहे की काय, अशी शंका येते. धर्मांध शक्तींचे गुन्हे उघड होत नसल्याने त्यांचे बळ वाढत आहे. हे गुन्हे उघड करण्यासाठी प्रयत्नशील असावे. बळवंत पवार यांनी प्रास्ताविक, एस. बी. पाटील यांनी स्वागत, तर आय. बी. मुन्शी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)संभाजी ब्रिगेडने आव्हान उभे केलेसंभाजी ब्रिगेडशी माझे मतभेद आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्या टर्रेबाज, टगेबाज धर्मांध शक्ती आहेत. त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे प्रकर्षाने काम संभाजी ब्रिगेडने केले आहे. त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, असे समर खडस यांनी सांगितले.पायरसी होते हे सुदैवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे शत्रू कोण, हे शरद पाटील यांनी पुस्तकाद्वारे मांडले. पण, त्यानंतर पानसरे यांनी पूर्ण महाराष्ट्राला खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. एका कम्युनिस्ट नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाची पायरसी होते, हे मला सुदैव वाटते, असे खडस यांनी सांगितले.