शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विचारांचा मागासलेपणा धर्मांधतेला पोषक

By admin | Updated: December 4, 2015 00:22 IST

समर खडस : ‘दहशतवाद आणि धर्मांधता’ या विषयावर गुंफले तिसरे पुष्प; दहशतवादाबद्दल चिंता

कोल्हापूर : पाश्चिमात्य देशातील उंच इमारती, झगमगाटातील जीवनशैलीची आपण कल्पना, अनुकरण करतो; पण, डोक्यात विचार मात्र पाकिस्तान, बांग्लादेश अशा देशांचे ठेवतो. या स्वरूपातील विचार हे दहशतवाद, धर्मांधतेला पोषक ठरणारे आहेत. दहशतवाद, धर्मांधता संपविण्यासाठी हे मागास विचार आपण सोडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक समर खडस यांनी गुरुवारी येथे केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प राजकीय विश्लेषक खडस यांनी गुंफले. त्यांचा विषय ‘दहशतवाद आणि धर्मांधता’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कॉ. दिलीप पवार होते.यावेळी खडस म्हणाले, भांडवलशाही व्यवस्था स्वत:च्या फायद्यासाठी एका हातात धर्मांधता आणि दुसऱ्या हातात दहशतवादाचे भूत घेऊन अनेक खेळी करते. वित्तीय दिशेने जाणारी भांडवलशाही सट्टेबाज असते. तिच्या सुरक्षेसाठी धर्मांधता आणि दहशतवाद वाढविला जातो. हिंदू, ज्यू अशा प्रत्येक धर्मात नास्तिकतेची मोठी परंपरा आहे. पण, नास्तिकांना धर्मात स्थान नसले तरी त्यांना समाजात एक विशिष्ट जागा आहे. आज जगभरातील मुस्लिमांमध्ये जो कळीचा प्रश्न आहे, तो माझ्या दृष्टीने त्यांच्यामध्ये नास्तिकतेला जागा नसल्याचा आहे. प्रत्येकाला देव मान्य करण्याचा अथवा न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसा समजा एखादा नास्तिक असेल तर, त्याचा तो अधिकार तुम्हाला मान्य करायला पाहिजे. हा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. ते येथील हिंदुत्ववादी शक्तींना फायदेशीर ठरते. जिथे ‘एमआयएम’ वाढते, तिथे भाजपच्या जागा वाढल्या असल्याचे दिसते. म्हणजे एका धर्मातील कट्टरवाद दुसऱ्या धर्मातील त्याच प्रवृत्तींना खतपाणी घालतो. हे चित्र बदलण्यासाठी देशातील उदारमतवादी मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा.कॉ. दिलीप पवार म्हणाले, दहशतवादाचा उगम राजकीय हस्तक्षेपात आहे. हा हस्तक्षेप निर्माण करण्याची संधी विकसनशील देशांतून मिळते. पहिल्यांदा ते थांबविले पाहिजे. सध्याची देशातील स्थिती पाहता धर्मांधतेला सरकारचे बळ आहे की काय, अशी शंका येते. धर्मांध शक्तींचे गुन्हे उघड होत नसल्याने त्यांचे बळ वाढत आहे. हे गुन्हे उघड करण्यासाठी प्रयत्नशील असावे. बळवंत पवार यांनी प्रास्ताविक, एस. बी. पाटील यांनी स्वागत, तर आय. बी. मुन्शी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)संभाजी ब्रिगेडने आव्हान उभे केलेसंभाजी ब्रिगेडशी माझे मतभेद आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्या टर्रेबाज, टगेबाज धर्मांध शक्ती आहेत. त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे प्रकर्षाने काम संभाजी ब्रिगेडने केले आहे. त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, असे समर खडस यांनी सांगितले.पायरसी होते हे सुदैवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे शत्रू कोण, हे शरद पाटील यांनी पुस्तकाद्वारे मांडले. पण, त्यानंतर पानसरे यांनी पूर्ण महाराष्ट्राला खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. एका कम्युनिस्ट नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाची पायरसी होते, हे मला सुदैव वाटते, असे खडस यांनी सांगितले.