शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘गोकुळ’ रणांगणात ‘बाबां’चे अस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे रणांगण आरोप-प्रत्यारोपामुळे धगधगत असताना आता शेवटचे अस्त्र म्हणून ‘बाबां’ना बाहेर काढले आहे. दोन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे रणांगण आरोप-प्रत्यारोपामुळे धगधगत असताना आता शेवटचे अस्त्र म्हणून ‘बाबां’ना बाहेर काढले आहे. दोन्ही आघाड्यांनी ठरावधारकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी महाराजांच्या ताकदीचा वापर सुरू केला असून, ‘आंध्र’ व कर्नाटकातील महाराजांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे.

‘गोकुळ’च्या सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी दोन्ही आघाडींच्या नेत्यांची आहे. गेली दोन महिने एकमेकांवर आरोप करून वस्त्रहरण करण्याची एकही संधी नेत्यांनी सोडलेली नाही. प्रचार सभांतील आरोप-प्रत्यारोपांबरोबरच ठरावधारकांकडे केलेल्या भांडवली गुंतवणुकीने जिल्हा ढवळून निघाला. सोशल मीडियाचा वापर करून एकमेकांची बदनामी करण्यातही आघाड्यांचे नेते मागे राहिले नाहीत.

उद्या, रविवारी मतदान होत आहे, सुमारे दोन हजार ठरावधारक दोन्ही आघाड्यांच्या ताब्यात आहेत. तरीही विजयाची खात्री नसल्याने शेवटचे ‘बाबा’ अस्त्र बाहेर काढले आहे. प्रत्येक निवडणुकीत या अस्त्राचा वापर केला जातो. मात्र, ‘गोकुळ‘मध्ये थेट आंध्र प्रदेश व कर्नाटकातील महाराजांना कोल्हापुरात पाचारण केले आहे. शुक्रवार ते रविवारी असे तीन दिवस ते कोल्हापुरात तळ ठोकून राहणार आहेत.

‘शिष्य’ की ‘गुरू’ भारी पडणार

एका आघाडीने आंध्र प्रदेशमधून बड्या बाबांच्या शिष्याला आणले आहे, तर दुसऱ्या आघाडीने कर्नाटकातील थेट गुरूलाच आणले आहे. ‘गोकुळ’च्या रणांगणात ‘गुरू’, शिष्याला चीतपट करणार की शिष्य गुरूचा पट काढणार, हे मंगळवारी दिसणार आहे.