शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
6
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
7
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
8
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
9
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
10
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
11
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
12
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
13
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
14
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
15
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
16
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
17
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
18
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
19
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
20
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

बाबर खूनप्रकरणी पाचजणांवर दोषारोपपत्र

By admin | Updated: October 20, 2015 23:47 IST

तपास पूर्ण : बबलूच्या पुतण्यासह इतरांवर आरोप

कऱ्हाड : बबलू मानेच्या खुनानंतर बाबर खानला दगडाने ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी मंगळवारी पाचजणांविरोधात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले दोषारोपपत्र सुमारे साडेपाचशे पानांचे असून, सर्व संशयितांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी सांगितले. सागर चंद्रकांत माने (वय २५), ऋषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड), विशाल हिंदुराव कांबळे (२५, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), अक्षय सुनील शेंद्रे (२०), विक्रम ऊर्फ अक्षय विश्वास शिंदे (२८, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) अशी आरोपींची नावे आहेत.कऱ्हाड येथे मंडई परिसरात २० जुलै रोजी सकाळी टोळीयुद्धाचा भडका उडाला. कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या व बबलू माने यांच्यात वर्चस्ववाद होता. या दोघांच्या टोळीमध्ये वारंवार खटके उडाले होते. त्याचाच भडका २० जुलै रोजी उडाला. बबलू हा त्याच्या घरानजीकच्या चौकात वर्तमानपत्र वाचत बसला होता.त्यावेळी त्याच्या पाळतीवर असणाऱ्या बाबर खानने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. बाबरने स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून बबलूवर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये बबलू गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर बाबरला प्रतिकार करण्यासाठी आलेली बबलूची आई गोळीबारात जखमी झाली. बबलूच्या खुनानंतर बाबर तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, जमावाने त्याला घेरले. त्याला दगडाने मारहाण केली. तसेच नजीकच पडलेली सिमेंटची पाईप उचलून ती बाबरच्या डोक्यात घालण्यात आली. त्यामध्ये बाबरचा जागीच मृत्यू झाला. बाबरच्या खूनप्रकरणी त्याचा भाऊ नासिर शमशाद खान याने कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी या प्रकरणाचा तपास केला. बबलूचा पुतण्या सागर माने, ऋषिकेश शेंद्रे, पप्पू ऊर्फ विशाल कांबळे, विक्रम ऊर्फ अक्षय शिंदे, अक्षय शेंदरे या पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडे या प्रकरणाबाबत कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी बाबरच्या खुनाची कबुली दिली. खुनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात सुमारे साडेपाचशे पानांचे आरोपपत्र तयार केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या यादीत बबलूचे नावबाबरच्या खूनप्रकरणात आरोपींच्या यादीमध्ये पोलिसांनी मृत बबलूचेही नाव घेतले आहे. मात्र, त्याच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आला नसल्याचे निरीक्षक राजमाने यांनी सांगितले. बेकायदा जमाव जमविणे, अवजड हत्याराने खून करणे, आदी आरोप पोलिसांनी संशयितांवर ठेवले आहेत.