शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील दुधवाला ‘बाबा’

By admin | Updated: June 1, 2015 00:14 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

आजही भारतात दोन तृतीयांश लोक कृषी व्यवसायात आहेत. यामध्ये मोठा वाटा भूमीहीन मजूरांचा आहे. भूमीहीन मजूरही एखादे- दुसरे दुभते जनावर (गाय/म्हैस) पाळतात. अशा गरीबाकडील दूध संकलन आणि वाटपाची पध्दती कार्यक्षम नव्हती. ग्राहकांची संख्या मोठी असूनही अव्यवस्थेमुळे देशभर दुधाची टंचाई भासत होती. वाढते शहरीकरण तर या समस्येला भीषण रुप देत होते. दुग्धजन्य पदार्थांची आयात करावी, अशी परिस्थिती असताना ‘विसाव्या शतकातील एक सर्वश्रेष्ठ कृषी क्षेत्रातील नेतृत्व’ उदयाला आहे. ते म्हणजे वर्गीस कुरियन! त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना संघटीत केलं.वर्गीस कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी कालिकत येथे झाला. त्यांचे वडील कोचीनमधील प्रख्यात सर्जन होते. वर्गीस कुरियन यांनी प्रथम पदार्थविज्ञान शास्त्रात बी.एस्सी. ही पदवी चेन्नई येथील प्रसिध्द लॉयला महाविद्यालयातून मिळवली. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवितानाच ते टाटा स्टिलमध्ये रुजू झाले. १९४६मध्ये त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी मिशिगन विद्यापीठात जाण्यासाठी भारत सरकारने शिष्यवृत्ती दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करुन ते १९४९ मध्ये भारतात परतले. शिष्यवृत्तीच्या अटीनुसार सरकारने त्यांची आनंद येथील सरकारच्या दुधाची भुकटी तयार करावयाच्या प्रकल्पात नियुक्ती केली. आनंद आज सर्व भारतवासियांना माहित झालेले गाव असले तरी त्याकाळी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एक खेडे होते. तेथे मोठ्या अनिच्छेनेच वर्गीस रुजू झाले. मेपासून आनंद येथील कामास सुरुवात केली. पण हे काम सोडून जावे, असा अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा. मात्र त्या प्रकल्पाचे पालकत्व सांभाळणारे त्रिभुवनदास पटेल यांनी वर्गीस कुरियन यांचे मन वळविले आणि नंतर वर्गीस हे आनंद येथेच रमले. त्याठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना जागृत केले.त्रिभुनवदास पटेल आणि वर्गीस कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संघटीत केले. त्यांच्या सहकारी सोसायट्या सुरू केल्या. दुधाचे संकलन आणि त्याची डेअरीपर्यंतची वाहतूक यामध्ये शिस्त आणली. त्याचवेळी आनंद येथील प्रकल्पात म्हशीच्या दुधाची पावडर तयार करण्याचे तंत्र विकसित होत होते. त्यामध्ये कुरियन यांच्या सहकाऱ्यांना यश मिळाले आणि भारतीय दुधाच्या पावडरने नेस्ले यासारख्या मातब्बर कंपनीला मात देत ‘अमूल’ हा ब्रँड पुढे आणला. आनंद येथील प्रकल्पाचे यश पाहून वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन केले आणि आनंदच्या धर्तीवर दुधाच्या क्षेत्रात सहकार चळवळ उभा करण्याचे कार्य सुरू झाले. याच्याच दुसऱ्या टप्प्यात ‘दुधाचा महापूर योजना’ सुरू झाली आणि भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. यामध्ये वर्गीस यांनी कोणताही नवीन शोध लावला नसला तरी कुशल संघटन आणि अत्युत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या जोरावर भारतीय शेतकऱ्यांचे हित साधत त्याला एक चांगल्या प्रगतीच्या दिशेवर आणले. त्यांच्या यश कार्याचा गौरव करीत त्यांना १९८९ मध्ये वर्ल्ड फूड प्राईझ देण्यात आले. भारत सरकारने पद्मविभूषण पारितोषिक दिले. १९६३ मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी ९ सप्टेंबर २०१२ रोजी गुजराथमधील नडियाड येथे त्यांचे निधन झाले. भारतातील दुधवाला बाबा म्हणून त्यांची आठवण मात्र चिरंतन आहे. कुरियन यांनी केलेलं कार्य हे आजही त्यांच्या रुपाने अमर राहिलं आहे. - डॉ. व्ही. एन. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर वर्गीस कुरियन