शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एव्हीएच’ला कुपेकरांच्या सरकारचीच मान्यता

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

चंद्रकांतदादांचा टोला : पीककर्जाच्या परतफेडीला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : चंदगड येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पाला स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या कारकिर्दीत त्यांचेच आघाडी सरकार असताना मंजुरी दिली आहे, सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारने नव्हे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. प्रकल्पासाठी सर्व मंजुरी आघाडी सरकारने दिलेल्या आहेत; त्यामुळे आघाडी सरकारने केलेल्या कराराला आम्ही बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एव्हीएच’ प्रकल्प बंद करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलन सुरू केले आहे.याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, या प्रकल्पाला मंजुरी, पर्यावरण विभागाच्या मंजुरीसह सर्वच मान्यता कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दिलेला आहेत. स्व. बाबासाहेब कुपेकर हे आमदार असताना मंजुरीचे निर्णय झालेले आहेत. आघाडी सरकारने केलेल्या कराराशी महायुतीच्या सरकारला बांधील राहावे लागत आहे. याबाबत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलन करण्यापेक्षा न्यायालयात दाद मागून पर्यावरण विभागालाच याबाबत जाब विचारला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ होत आहे, हे मान्य आहे; पण सरकार या प्रश्नी थांबलेले नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावर, हंगाम संपत आला तरी अनेक कारखान्यांनी जानेवारीमध्ये तुटलेल्या आणि गाळप झालेल्या उसाचे पैसे दिलेले नाहीत; त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ होत नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मार्चअखेर पीककर्जाची परतफेड केली नाही तर व्याज सवलतीचा लाभ घेता येत नाही. यासाठी पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ( प्रतिनिधी)राज्यमंत्र्यांसाठी‘राज्य परिषद’!राज्यमंत्र्यांना अधिकार नसल्याच्या तक्रारी येत आहेत; पण शासनाच्या अध्यादेशानुसार काम सुरू आहे. तरीही एखाद्या कॅबिनेटच्या बैठकीला सर्व राज्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर सर्व राज्यमंत्र्यांबरोबर महिन्याला एक बैठक घेतली जाणार असून त्याला ‘ राज्य परिषद’ असे संबोधले जाणार आहे.