शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

‘एव्हीएच’ला कुपेकरांच्या सरकारचीच मान्यता

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

चंद्रकांतदादांचा टोला : पीककर्जाच्या परतफेडीला मुदतवाढ देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : चंदगड येथील ‘एव्हीएच’ प्रकल्पाला स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या कारकिर्दीत त्यांचेच आघाडी सरकार असताना मंजुरी दिली आहे, सध्याच्या सत्ताधारी भाजप सरकारने नव्हे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. प्रकल्पासाठी सर्व मंजुरी आघाडी सरकारने दिलेल्या आहेत; त्यामुळे आघाडी सरकारने केलेल्या कराराला आम्ही बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एव्हीएच’ प्रकल्प बंद करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलन सुरू केले आहे.याबाबत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले, या प्रकल्पाला मंजुरी, पर्यावरण विभागाच्या मंजुरीसह सर्वच मान्यता कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात दिलेला आहेत. स्व. बाबासाहेब कुपेकर हे आमदार असताना मंजुरीचे निर्णय झालेले आहेत. आघाडी सरकारने केलेल्या कराराशी महायुतीच्या सरकारला बांधील राहावे लागत आहे. याबाबत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आंदोलन करण्यापेक्षा न्यायालयात दाद मागून पर्यावरण विभागालाच याबाबत जाब विचारला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ होत आहे, हे मान्य आहे; पण सरकार या प्रश्नी थांबलेले नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यावर, हंगाम संपत आला तरी अनेक कारखान्यांनी जानेवारीमध्ये तुटलेल्या आणि गाळप झालेल्या उसाचे पैसे दिलेले नाहीत; त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ होत नसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मार्चअखेर पीककर्जाची परतफेड केली नाही तर व्याज सवलतीचा लाभ घेता येत नाही. यासाठी पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ( प्रतिनिधी)राज्यमंत्र्यांसाठी‘राज्य परिषद’!राज्यमंत्र्यांना अधिकार नसल्याच्या तक्रारी येत आहेत; पण शासनाच्या अध्यादेशानुसार काम सुरू आहे. तरीही एखाद्या कॅबिनेटच्या बैठकीला सर्व राज्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर सर्व राज्यमंत्र्यांबरोबर महिन्याला एक बैठक घेतली जाणार असून त्याला ‘ राज्य परिषद’ असे संबोधले जाणार आहे.