शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तूरच्या विकासाला पुरस्कारांची पोच

By admin | Updated: May 9, 2017 00:30 IST

तालुका, जिल्हा, राज्य पुरस्कार प्राप्त : विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकांचे योगदान

 रवींद्र येसादे ।  -लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : आजरा तालुक्यातील उत्तूर हे २२ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणारे गाव. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावाने सन २००९ ते २०१७ पर्यंत १२ पुरस्कार तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर मिळविले आहेत. पुरस्कारांतून गावचा विकास ही उत्तूर गावची ओळख झाली आहे.राज्य सरकारची गौरव गावसभा ही योजना गावाने राबवून गौरव सभेचा पुरस्कार २०१० मध्ये तालुका, जिल्हास्तरावर मिळविला. तेव्हापासून पुरस्कार मिळविणे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच पुरस्कार मिळू लागले.शासनाच्या पुरस्कार प्राप्तीसाठी असणाऱ्या नियम, अटींचे पालन करून गावच्या विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.शैक्षणिकदृष्ट्या अगे्रसर असणारे गाव असूनही प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांचे नियोजन, स्पर्धात्मक मार्गदर्शनाखाली गं्रथालय उपलब्ध आहेत. आदी सर्व घटकांची पाहणी पथकाकडून केली जाते. गावच्या विकासाच्या दृष्टीने योजनांची प्रभावीपणे मांडणी करून गावास अधिकाधिक पुरस्कार मिळवून देऊन पुरस्कारांतून थेट शासनाच्या निधीतून विकासासाठी निधी ग्रामपंचायतीला मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सात वर्षे उत्तम काम करण्याची संधी उत्तुरातील सर्व गटातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मनोबल उंचावले आहे.- राजेंद्र नुल्ले, ग्रामविकास अधिकारी.पुरस्कारप्राप्त सरपंचनवी दिल्ली येथे माजी सरपंच रमेश ढोणुक्षे यांनी निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारला.पर्यावरण तज्ज्ञ पुरस्कार, यशवंत राज्य पुरस्कार २०१४-१५, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१४-१५ माजी सरपंच सुप्रिया पाटील यांनी स्वीकारला.यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१५-१६, यशवंत सरपंच पुरस्कार माजी सरपंच वनिता ढोणुक्षे यांनी स्वीकारला.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम योजना पुरस्कार सरपंच हर्षदा खोराटे यांनी स्वीकारला.जिल्ह्यातील पहिली आयएसओ २०१५ मानांकन असणारी ग्रामपंचायत आहे. कॅशलेस प्रणाली वापरून १ लाख ८४ हजार रुपये कर जमा करण्यात आला आहे. आॅनलाईन दाखले, एस. टी. आरक्षण, एस.एम.एस.द्वारे गावसभा संदेश, १०० टक्के करवसुली, दारूबंदी असणारे गाव, हागणदारीमुक्त गाव, प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन, प्रत्येक घरात एलईडी बल्ब, स्ट्रीट लाईटसाठी एल.ई.डी. बल्बचा वापर, २४६२१ झाडांपैकी १४२५२ झाडे गावाने जगविली आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी, लिपिक ते कर्मचारी यांनी योग्यप्रकारे नियोजन केल्याने यश मिळाले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून कचरा उठावासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली, मिनी कचरा उठाव मशीन व तीनचाकी व चारचाकी वाहन देण्यात आले.या वाहनातून दररोज कचरा गोळा करून धामणे पठारावरील गायरानात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दररोजच्या कचरा उठावासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून डस्टबिन दिली आहे. कचरागाडी रोज गावात फिरत असल्याने ओला व सुका कचरा गाडीत टाकला जातो.