शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

उत्तूरच्या विकासाला पुरस्कारांची पोच

By admin | Updated: May 9, 2017 00:30 IST

तालुका, जिल्हा, राज्य पुरस्कार प्राप्त : विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षकांचे योगदान

 रवींद्र येसादे ।  -लोकमत न्यूज नेटवर्कउत्तूर : आजरा तालुक्यातील उत्तूर हे २२ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणारे गाव. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावाने सन २००९ ते २०१७ पर्यंत १२ पुरस्कार तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर मिळविले आहेत. पुरस्कारांतून गावचा विकास ही उत्तूर गावची ओळख झाली आहे.राज्य सरकारची गौरव गावसभा ही योजना गावाने राबवून गौरव सभेचा पुरस्कार २०१० मध्ये तालुका, जिल्हास्तरावर मिळविला. तेव्हापासून पुरस्कार मिळविणे हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. यातूनच पुरस्कार मिळू लागले.शासनाच्या पुरस्कार प्राप्तीसाठी असणाऱ्या नियम, अटींचे पालन करून गावच्या विकासात पदाधिकारी, सेवाभावी संस्था, शाळकरी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.शैक्षणिकदृष्ट्या अगे्रसर असणारे गाव असूनही प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्ड्यांचे नियोजन, स्पर्धात्मक मार्गदर्शनाखाली गं्रथालय उपलब्ध आहेत. आदी सर्व घटकांची पाहणी पथकाकडून केली जाते. गावच्या विकासाच्या दृष्टीने योजनांची प्रभावीपणे मांडणी करून गावास अधिकाधिक पुरस्कार मिळवून देऊन पुरस्कारांतून थेट शासनाच्या निधीतून विकासासाठी निधी ग्रामपंचायतीला मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सात वर्षे उत्तम काम करण्याची संधी उत्तुरातील सर्व गटातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मनोबल उंचावले आहे.- राजेंद्र नुल्ले, ग्रामविकास अधिकारी.पुरस्कारप्राप्त सरपंचनवी दिल्ली येथे माजी सरपंच रमेश ढोणुक्षे यांनी निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारला.पर्यावरण तज्ज्ञ पुरस्कार, यशवंत राज्य पुरस्कार २०१४-१५, यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१४-१५ माजी सरपंच सुप्रिया पाटील यांनी स्वीकारला.यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार २०१५-१६, यशवंत सरपंच पुरस्कार माजी सरपंच वनिता ढोणुक्षे यांनी स्वीकारला.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, स्मार्ट ग्राम योजना पुरस्कार सरपंच हर्षदा खोराटे यांनी स्वीकारला.जिल्ह्यातील पहिली आयएसओ २०१५ मानांकन असणारी ग्रामपंचायत आहे. कॅशलेस प्रणाली वापरून १ लाख ८४ हजार रुपये कर जमा करण्यात आला आहे. आॅनलाईन दाखले, एस. टी. आरक्षण, एस.एम.एस.द्वारे गावसभा संदेश, १०० टक्के करवसुली, दारूबंदी असणारे गाव, हागणदारीमुक्त गाव, प्रत्येक घरात नळाचे कनेक्शन, प्रत्येक घरात एलईडी बल्ब, स्ट्रीट लाईटसाठी एल.ई.डी. बल्बचा वापर, २४६२१ झाडांपैकी १४२५२ झाडे गावाने जगविली आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी, लिपिक ते कर्मचारी यांनी योग्यप्रकारे नियोजन केल्याने यश मिळाले. जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून कचरा उठावासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली, मिनी कचरा उठाव मशीन व तीनचाकी व चारचाकी वाहन देण्यात आले.या वाहनातून दररोज कचरा गोळा करून धामणे पठारावरील गायरानात कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दररोजच्या कचरा उठावासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे यांच्या फंडातून डस्टबिन दिली आहे. कचरागाडी रोज गावात फिरत असल्याने ओला व सुका कचरा गाडीत टाकला जातो.