शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प्रदर्शनातून ग्राहकांचे प्रबोधन

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

राष्ट्रीय ग्राहक दिन : विविध शासकीय विभागाकडून प्रबोधनामत्क स्टॉल

कोल्हापूर : दुधात भेसळ कशी होते, वजन, मापात पाप कसे होते, त्यातून ग्राहकांनी कसे सजग राहावे, आदी माहिती आज, बुधवारी ग्राहकांना मिळाली. निमित्त होते भवानी मंडप येथे भरविण्यात आलेल्या ग्राहक प्रबोधन प्रदर्शनाचे. पुरवठा विभागातर्फे भवानी मंडपात शेतकरी संघाच्या इमारतीसमोर विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून प्रबोधनपर माहिती देणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल यांच्या हस्ते झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग, पुरवठा विभाग, डाक विभाग, भारतीय दूरसंचार निगम, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), एस. टी. महामंडळ, कृषी कार्यालय, आदी विभागांचा यामध्ये समावेश होता. अन्न औषध प्रशासन विभागाच्या स्टॉलमधून दुधासह विविध अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ कशी ओळखायची अशा स्पॉट टेस्टबाबत माहिती दिली जात होती; तर वजन व मापे विभागातर्फे वस्तू खरेदी करताना वजनातून ग्राहकांची लूट कशी होते, याबाबत प्रबोधन केले जात होते. प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी होती.दरम्यान, शहर पुरवठा कार्यालय व करवीर तहसील कार्यालय यांच्यातर्फे प्रायव्हेट हायस्कूल येथे ग्राहक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल उपस्थित होते. विवेक आगवणे म्हणाले, विविध मोहांना बळी पडल्याने ग्राहकांची फसवणूक होते. ती रोखणे व ग्राहक हिताचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी कायद्याचा प्रचार, प्रसार व जनजागृती होणे आवश्यक आहे.वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक डी. पी. पोवार यांनी वैध मापन म्हणजे काय, वजन मापन पद्धती, वैधमापन कायद्याची उपयुक्तता याबाबत तर अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त एस. एम. देशमुख यांनी ‘स्वच्छ व आरोग्यदायी जीवन’ या विषयावर माहिती दिली.यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, तहसीलदार योगेश खरमाटे, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव, ज्योत्स्ना डासाळकर, उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना मंचचे अध्यक्ष संजय बोरवाल. शेजारी डावीकडून रूपाली घाटगे, दिनेश गवळी, प्रताप जाधव, विवेक घाटगे.९० दिवसांत तक्रार निर्णायक व्हावीकोल्हापूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर ती ९० दिवसांच्या आत निर्णायक व्हावी, अशी तरतूद ग्राहक संरक्षण कायद्यात आहे; परंतु तांत्रिक कारणामुळे ग्राहकास त्याच्या तक्रारीचे प्रतिफळ मिळण्यास दिनावधी लागत असतो. त्याकरिता ग्राहक मंचानेही तत्परतेने तक्रारी निकाली करून ग्राहकांची होणारी पिळवणूक व फसवणूक थांबविली पाहिजे, अशी अपेक्षा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर्स प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप जाधव यांनी आज, बुधवारी येथे बोलताना व्यक्त केली. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ कार्यक्रमात अ‍ॅड. जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक मंचाचे अध्यक्ष संजय बोरवाल होते. कार्यक्रमास ग्राहक मंचचे दिनेश गवळी, रूपाली घाटगे यांच्यासह अ‍ॅड. दंडगे, हेमंत मखरे, संतोष तावदारे, संजर डिक्रूज, प्रबंधक जे. एस. देसाई उपस्थित होते.