शिरोळ : शासनाच्या स्वच्छता अभियानात शिरोळ नगरपालिकेने सहभाग घेतला आहे. या अभियानातून शहरवासीयांना ओला व सुक्या कचऱ्याचे महत्व पटवून दिले जात आहे. ओल्या कचऱ्यातून विड्रो कंपोस्ट खताचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. बोलक्या भिंतीतून स्वच्छतेचा जागर केला जात आहे.
शासनामार्फत स्वच्छता अभियान राबविले जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी येथील नगरपालिकेने सहभाग घेतला आहे. शहरात दैनंदिन संकलित होणारा कचरा व त्याची विल्हेवाट यावर पालिकेने भर दिला आहे. घंटागाडीवरील स्वच्छतेच्या गाण्यातून कचऱ्याचे महत्व पटवून दिले जात आहे. या प्रबोधन बरोबरच नदीवेस मार्गावरील दसरा चौक या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून विड्रो कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बेड तयार केले जात आहेत. साधारणतः ४० दिवसानंतर या खताची निर्मिती होते. स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहराची स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. पालिकेने स्वच्छ अभियानात सहभाग घेतला आहे. त्यामुळे घंटागाडीत कचरा टाकून आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांनी केले आहे.
फोटो - २६०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथे बोलक्या भिंतीतून स्वच्छतेचा जागर केला जात आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)