शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘राष्ट्रवादी’तून आवाडे यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:59 IST

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ राहिले नसल्याच्या कारणावरून आवाडे यांनी हा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढविण्याची ...

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ राहिले नसल्याच्या कारणावरून आवाडे यांनी हा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्या प्रयत्नाचांच हा भाग असल्याचे मानण्यात येते.गेल्याच पंधरवड्यात काँग्रेसअंतर्गत जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी असलेले राजकीय वैर आवाडे कुटुंबीयांनी संपुष्टात आणले व हातात हात घेऊन काँग्रेस मजबूत करण्याची ग्वाही दिली. आवाडे घराणे आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे व त्या पक्षानेही त्यांना आजपर्यंत सत्तेची भरपूर संधी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होतानाच ते त्या पक्षात जातील असे होरा होता; परंतु त्यावेळी त्यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला; तथापि आजपर्यंतच्या वाटचालीत पवार यांची आवाडे यांच्या ताब्यातील संस्थांच्या अडीअडचणीवेळी खूप मदत झाली आहे. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघावरही पवार यांच्यामुळेच संधी मिळाली होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याचा हातकणंगले मतदारसंघ आवाडे यांच्यासाठी पवार यांनीच सोडला व त्यांना विजयी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. या सर्व प्रक्रियेत आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती.आता त्यांच्याकडेच पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी काही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच प्रकाश आवाडे यांचे नाव विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून पुढे आले आहे.इचलकरंजीत राष्ट्रवादीत मदन कारंडे व माजी आमदार अशोक जांभळे असे दोन गट आहेत. त्यांना पक्षाने आपल्याला ही जागा लढवायची असल्याने बूथ कमिट्यांची रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवार कोण असेल हे सांगितलेले नाही.स्थानिक राजकारणात आवाडे व कारंडे गट यांच्यात टोकाचेवितुष्ट आहे, हेदेखील नाकारता येत नाही.पाच जागांचा आग्रहराष्ट्रवादीने जिल्ह्यातील कागल-गडहिंग्लज, चंदगड-आजरा, राधानगरी-भुदरगड हे हक्काचे तीन मतदारसंघ व त्याचबरोबर शिरोळ आणि इचलकरंजी असे पाच मतदारसंघ लढविण्याची तयारी केली आहे. इचलकरंजीत आवाडे गट काँग्रेससोबतच राहिला तर कोल्हापूर उत्तरच्या जागेवरही हा पक्ष दावा करू शकतो; परंतु ‘उत्तर’मध्ये पक्षाकडे ताकदीने लढण्यासाठी उमेदवार नाही. त्यामुळे इचलकरंजीवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने कार्याध्यक्षपदी राजेंद्र यड्रावकर यांना संधी दिली, त्यामागेही विधानसभेचेच राजकारण आहे.