शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

पूरबुडीत क्षेत्राची काळजी घेऊन नुकसान टाळा

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

ऊस संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखविली तर नुकसान कमी होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पुरामुळे नदीकाठचे ऊसपीक दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली जाते. गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. कोंब फुटलेला ऊस पोकळ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, त्याचे वजन घटते. उसाचे शेंडे पाण्याच्या वर राहिले तरीही खालील पानांवर थर बसून नुकसान होते. कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसून कांड्यांना मुळे फुटतात. तसेच कांडीवरील डोळे फुगीर होऊन कोंब फुटण्यास सुरुवात होते. ऊसक्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीतील जैविक पातळी कमी होते. तसेच जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते; तसेच पुराच्या पाण्यामुळे उसाच्या मुळ्या अकार्यक्षम होऊन ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर नुकसान कमी करणे शक्य असल्याचे आवाहन ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. एम. मोरे, डॉ. व्ही. एन. नाळे, डॉ. व्ही. वाय. कंकाळ व डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी) या करा उपाययोजना पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे. पूरबुडीत उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत संरक्षक उपाय म्हणून सरीमध्ये टाकावे. उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी. ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत. एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.