शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

पूरबुडीत क्षेत्राची काळजी घेऊन नुकसान टाळा

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

ऊस संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखविली तर नुकसान कमी होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पुरामुळे नदीकाठचे ऊसपीक दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली जाते. गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. कोंब फुटलेला ऊस पोकळ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, त्याचे वजन घटते. उसाचे शेंडे पाण्याच्या वर राहिले तरीही खालील पानांवर थर बसून नुकसान होते. कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसून कांड्यांना मुळे फुटतात. तसेच कांडीवरील डोळे फुगीर होऊन कोंब फुटण्यास सुरुवात होते. ऊसक्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीतील जैविक पातळी कमी होते. तसेच जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते; तसेच पुराच्या पाण्यामुळे उसाच्या मुळ्या अकार्यक्षम होऊन ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर नुकसान कमी करणे शक्य असल्याचे आवाहन ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. एम. मोरे, डॉ. व्ही. एन. नाळे, डॉ. व्ही. वाय. कंकाळ व डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी) या करा उपाययोजना पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे. पूरबुडीत उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत संरक्षक उपाय म्हणून सरीमध्ये टाकावे. उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी. ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत. एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.