शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

पूरबुडीत क्षेत्राची काळजी घेऊन नुकसान टाळा

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

ऊस संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखविली तर नुकसान कमी होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पुरामुळे नदीकाठचे ऊसपीक दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली जाते. गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. कोंब फुटलेला ऊस पोकळ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, त्याचे वजन घटते. उसाचे शेंडे पाण्याच्या वर राहिले तरीही खालील पानांवर थर बसून नुकसान होते. कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसून कांड्यांना मुळे फुटतात. तसेच कांडीवरील डोळे फुगीर होऊन कोंब फुटण्यास सुरुवात होते. ऊसक्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीतील जैविक पातळी कमी होते. तसेच जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते; तसेच पुराच्या पाण्यामुळे उसाच्या मुळ्या अकार्यक्षम होऊन ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर नुकसान कमी करणे शक्य असल्याचे आवाहन ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. एम. मोरे, डॉ. व्ही. एन. नाळे, डॉ. व्ही. वाय. कंकाळ व डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी) या करा उपाययोजना पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे. पूरबुडीत उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत संरक्षक उपाय म्हणून सरीमध्ये टाकावे. उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी. ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत. एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.