शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यावरील ‘जात’ कायद्याने घालवा

By admin | Updated: March 20, 2015 00:23 IST

प्रकाश आंबेडकर यांची मागणी : कोल्हापुरात जातविरोधी एल्गार परिषद

कोल्हापूर : जातिव्यवस्थेने इथल्या समाजात भिंती निर्माण केल्या. त्यामुळे जाती गाडल्या पाहिजेत. शाळेच्या दाखल्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या संघटनांनी जात का आवश्यक आहे, याची चर्चा आमच्यासोबत कुठेही करावी, असे आव्हान सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाची एल्गार परिषद येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये गुरुवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जातींनी समाजाचा विकास खुंटविला. जात हद्दपार झाली पाहिजे. आंतरजातीय दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्याची जात भारतीयच असली पाहिजे, हे ठराव आम्ही नागपूर आणि लातूर येथील परिषदेत केले आहेत. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जात आणि विशिष्ट धर्माचा आग्रह करून एकता कशी साधली जाऊ शकते, याबाबतची भूमिका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि ‘आरएसएस’ या संघटनांनी मांडली पाहिजे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावे, यासाठी ८ एप्रिलला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.आंदोलनाचे कार्यकारी निमंत्रक भारत पाटणकर म्हणाले,जातिअंताच्या लढाईसाठी मे महिन्यापर्यंत ही प्रबोधन मोहीम चालविण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. अंक पाठविण्यात येत आहेत. गोळ्या घालून विचार संपत नाहीत; पण अशा प्रवृत्तींना चोख उत्तर देईल. परिषदेत सुरुवातीला सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांना श्रद्धांजली वाहिली. किशोर ढमाले, अतुल दिघे, धनाजी गुरव, उदय नारकर, नामदेवराव गावडे, अरविंद देशमुख, डॉ. गेल आॅम्वेट यांची भाषणे झाली. यावेळी गौतमीपुत्र कांबळे, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते. परिषदेतील मागण्या आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन व दाम्पत्यांना संरक्षणशाळेच्या दाखल्यावरून जात कॉलम रद्द करण्यासाठी कायदा करावा, आंतरजातीय दाम्पत्याच्या अपत्याची जात ‘भारतीय’ अशी असावी.जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांना खुल्या चर्चेचे आव्हान