शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

दाखल्यावरील ‘जात’ कायद्याने घालवा

By admin | Updated: March 20, 2015 00:23 IST

प्रकाश आंबेडकर यांची मागणी : कोल्हापुरात जातविरोधी एल्गार परिषद

कोल्हापूर : जातिव्यवस्थेने इथल्या समाजात भिंती निर्माण केल्या. त्यामुळे जाती गाडल्या पाहिजेत. शाळेच्या दाखल्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या संघटनांनी जात का आवश्यक आहे, याची चर्चा आमच्यासोबत कुठेही करावी, असे आव्हान सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाची एल्गार परिषद येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये गुरुवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जातींनी समाजाचा विकास खुंटविला. जात हद्दपार झाली पाहिजे. आंतरजातीय दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्याची जात भारतीयच असली पाहिजे, हे ठराव आम्ही नागपूर आणि लातूर येथील परिषदेत केले आहेत. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जात आणि विशिष्ट धर्माचा आग्रह करून एकता कशी साधली जाऊ शकते, याबाबतची भूमिका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि ‘आरएसएस’ या संघटनांनी मांडली पाहिजे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावे, यासाठी ८ एप्रिलला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.आंदोलनाचे कार्यकारी निमंत्रक भारत पाटणकर म्हणाले,जातिअंताच्या लढाईसाठी मे महिन्यापर्यंत ही प्रबोधन मोहीम चालविण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. अंक पाठविण्यात येत आहेत. गोळ्या घालून विचार संपत नाहीत; पण अशा प्रवृत्तींना चोख उत्तर देईल. परिषदेत सुरुवातीला सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांना श्रद्धांजली वाहिली. किशोर ढमाले, अतुल दिघे, धनाजी गुरव, उदय नारकर, नामदेवराव गावडे, अरविंद देशमुख, डॉ. गेल आॅम्वेट यांची भाषणे झाली. यावेळी गौतमीपुत्र कांबळे, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते. परिषदेतील मागण्या आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन व दाम्पत्यांना संरक्षणशाळेच्या दाखल्यावरून जात कॉलम रद्द करण्यासाठी कायदा करावा, आंतरजातीय दाम्पत्याच्या अपत्याची जात ‘भारतीय’ अशी असावी.जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांना खुल्या चर्चेचे आव्हान