शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

उजळाईवाडी गावठाणमधील अतिक्रमणे न काढल्यास ग्रामपंचायतीला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST

उचगाव: उजळाईवाडी (ता.करवीर) येथे गावठाण हद्दीत ८ ते १० एकर जागेत अतिक्रमण आहे. याविषयी वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठ ...

उचगाव:

उजळाईवाडी (ता.करवीर) येथे गावठाण हद्दीत ८ ते १० एकर जागेत अतिक्रमण आहे. याविषयी वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठ स्तरावर कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते संजय श्रीपती माने यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उजळाईवाडी गावठाणमध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थांनी ८ ते १० एकर जागेत अतिक्रमण केले आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायत, मंडल अधिकाऱ्यांसह तहसील तसेच जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उजळाईवाडीची लोकसंख्या २०ते २५ हजार इतकी आहे. गावात क्रीडांगण नाही. भाजी मंडई मुख्य रस्त्यावरच उभारली आहे. त्यामुळे ज्या जागेवर अतिक्रमण आहे. ती जागा उपलब्ध झाल्यास क्रीडांगण, भाजी मंडई, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा पार्क करता येईल, तसेच सध्या गावच्या पाणंदीशेजारील नाल्यात भराव टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह माजी सरंपचाचाही सहभाग आहे. यापूर्वीही याबाबत निवेदन सादर केले होते. अतिक्रमण आढळले असल्यास संबंधितावर फौजदारी करण्याचे आदेशही काढले होते. त्यावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावातील अतिक्रमण त्वरित थांबविण्यात यावे, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा संजय माने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर संजय श्रीपती माने, विश्वास पाटील, नारायण माने, दगडू बागणे, दिलीप माने, रवींद्र यादव, संजय दळवी, रवींद्र गडकरी, सात्ताप्पा माने, संजय कुंभार, सुभाष चव्हाण यांच्यासह अन्य नागरिकांच्या सह्या आहेत.

कोट:

पूर्वीपासून प्रत्येकाच्या वहिवाटी आहेत. गावचा विकास व्हायला पाहिजे. यादृष्टीने नागरी सुविधामधून काम सुरू आहे. कोणाच्या मर्जीतील लोकांना जागा देण्याचा प्रश्नच नाही. खोटे आरोप करून केवळ प्रसिद्धीसाठी निवेदने काढली जात आहेत. ज्यांना ८ ते १० एकर जागेवर अतिक्रमण झाले असे वाटते त्यांनी कुठे कुठे जागा आहे दाखवावे. वस्तुस्थिती माहीत नसलेल्या लोकांकडून खोटे आरोप होत आहेत.

- सुवर्णा माने

सरपंच, ग्रा. पं. उजळाईवाडी

कोट:

माझी लढाई गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या व जाणूबुजून अतिक्रमण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे. शासकीय यंत्रणा आदेश देते, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू ठेवणार आहे.

संजय श्रीपती माने

आरटीआय कार्यकर्ते,