शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

‘एव्हीएच’ने अखेर गाशा गुंडाळला

By admin | Updated: February 24, 2016 01:06 IST

विभागीय आयुक्तांना पत्र : कंपनी प्रकल्प स्थलांतरित करणार; परिसरातील जनतेच्या आंदोलनाला यश

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेला एव्हीएच प्रकल्प अखेर स्थलांतरित करीत असल्याचे पत्र कंपनीने पुणे येथील विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे गेली चार वर्षे पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असल्याचे कारण पुढे करून जतनेने तीव्र आंदोलने केली होती. जनतेने केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन कंपनीने गाशा गुंडाळला आहे. सन २०१२ मध्ये एव्हीएच प्रकल्पाची हलकर्णी औद्योगिक वसाहतीत उभारणी करण्यात आली होती; पण पर्यावरण व मानवी आरोग्याला घातक असल्याने या प्रकल्पाला उभारणीपासूनच जनतेने विरोध केला. निवृत्ती न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील, डॉ. नंदा बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला होता. कंपनीची दोनवेळा केलेली जाळपोळ, वाहने जाळणे, कँडल मोर्चा, वारकरी दिंडी, शाळकरी विद्यार्थ्यांचा गांधीगिरीने काढलेला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयाची केलेली मोडतोड, आदी आंदोलनामुळे कंपनी सुरू होण्यास प्रचंड अडथळे निर्माण झाले. कंपनीला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अखेर कंपनीने एव्हीएच प्रकल्प (इप्सिलॉन कार्बन प्रा. लि) सध्याचे बदललेले नाव हलकर्णी येथून हलवून कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सोंडुर तालुक्यातील मुशिनाथकनहळ्ळी या गावी हलविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रकल्पाची संपूर्ण यंत्रसामुग्री, कच्चा माल व इतर साहित्य हलविणार असल्याचे पत्र ११ जानेवारी २०१६ रोजी केंद्रीय सीमाशुल्क उपायुक्तांना दिले. तर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुन्हा कंपनीने दुसरे पत्र पुणे येथील विभागीय आयुक्तांना दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, शासनाने आज जरी कंपनीला उत्पादन घेण्यास परवानगी दिली तरी कंपनी व्यवस्थापनाची या ठिकाणी उत्पादन घेण्याची मानसिकता नाही. तांत्रिक अडचणी व कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्नही आहे. त्यामुळे आपण या ठिकाणाहून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प जनरेट्यामुळे हद्दपार झाला. याचे श्रेय तालुक्यातील जनतेला आहे. या प्रकल्पाविरोधात जनआंदोलन कृती समितीने शासन, कंपनी, अधिकारी यांच्याविरोधात सातत्याने संघर्ष केला. त्याला आज यश आल्याचे जनआंदोलन कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले. गडहिंग्लजला आनंदोत्सव गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील विनाशकारी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार करण्यात डॉ. नंदिनी बाभूळकर यांना यश मिळाल्याबद्दल गडहिंग्लज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी येथील दसरा चौकात साखर वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. जनआंदोलन कृती समितीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने, न्यायालयीन लढाई आणि तुरुंगवास पत्करून विनाशकारी प्रकल्प हद्दपार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल डॉ. बाभूळकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बी. एन. पाटील - मुगळीकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी, माजी सभापती अमर चव्हाण, सतीश पाटील, मोहन चव्हाण, आनंदा पाटील, राजू हसुरे, अभिजित पाटील, सहदेव कोकाटे, उमेश दंडगे, टी. एल. धुमाळ, आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)