शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

वाहन उद्योगास २०१६ नंतर सुगीचे दिवस

By admin | Updated: December 26, 2014 00:03 IST

राजू केटकाळे : टोयोटा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होण्याचा कोल्हापूरला मान

कोल्हापूर : सध्या मंदीतून वाटचाल करीत असलेल्या वाहन उद्योगास दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ नंतर पुन्हा ऊर्जितावस्था येईल. या काळात मानवी सुरक्षेच्या मानांकनाबाबत देशातील वाहने प्रगत देशाच्या जवळपास जातील. २०१९ पर्यंत जगभरातील प्रगत देशांप्रमाणे वाहन सुरक्षेची मानके देशातील सर्वच वाहनांमध्ये असतील, अशी माहिती कोल्हापुरातील कबनूरचे सुपुत्र टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू केटकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.कबनूर येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण, त्यानंतर कोल्हापुरात महाविद्यालयीन, तर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या राजू केटकाळे यांनी जगातील वाहन उद्योगात अग्रभागी असलेल्या टोयोटाच्या देशातील पहिल्या पाच अधिकारी असलेल्या पदापर्यंत मजल मारली. जगभरातील ६० टक्के मोटार गाड्यांचे डिझाईन भारतीय तंत्रज्ञांकडून होते. मराठी पर्यायाने भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जिद्दीने काम करण्याच्या जोरावर अशक्य नाही. ग्रामीण मुलांनी तंत्रज्ञ विषयात पुढे यावे, जग त्यांचेच आहे, अशा शब्दांत राजू केटकाळे यांनी तरुणांना आवाहन केले.केटकाळे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी तंत्रज्ञात कमी पडल्याने भारतीय वाहन उद्योग जगाच्या तुलनेत कमी पडत होता. वाहन उद्योगाला देशात मोठी संधी आहे. मोटार वापरात अमेरिका व जपानमध्ये दर हजारी ६०० नागरिक, तर थायलंडमध्ये ७० आहेत. भारतात हेच प्रमाण १९ ते २५ च्या दरम्यान आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग भविष्यात उचल खाईल. मोटार गाडीचा एक युनिट तब्बल ३० हजार रोजगार उपलब्ध करतो. देशात टोयोटाची अशी दोन युनिट आहेत. तिसरे युनिट लवकरच सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इंडिया’ ही योजना वाहनांसह सर्वच उद्योगांना नव्याने उभारणीसाठी ऊर्जा देणारी आहे. याचे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील. (प्रतिनिधी)वर्षाला एक लाख मोटार गाड्यांचे उत्पादन, १४०० कोटींची वार्षिक उलाढाल अन् आठ हजारांपेक्षा उच्च तंत्रज्ञयुक्त कर्मचाऱ्यांची धुरा सांभाळणारे केटकाळे यांनी वाहन उद्योगाबाबत भवितव्य सांगितले.