शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

वाहन उद्योगास २०१६ नंतर सुगीचे दिवस

By admin | Updated: December 26, 2014 00:03 IST

राजू केटकाळे : टोयोटा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होण्याचा कोल्हापूरला मान

कोल्हापूर : सध्या मंदीतून वाटचाल करीत असलेल्या वाहन उद्योगास दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ नंतर पुन्हा ऊर्जितावस्था येईल. या काळात मानवी सुरक्षेच्या मानांकनाबाबत देशातील वाहने प्रगत देशाच्या जवळपास जातील. २०१९ पर्यंत जगभरातील प्रगत देशांप्रमाणे वाहन सुरक्षेची मानके देशातील सर्वच वाहनांमध्ये असतील, अशी माहिती कोल्हापुरातील कबनूरचे सुपुत्र टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू केटकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.कबनूर येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण, त्यानंतर कोल्हापुरात महाविद्यालयीन, तर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या राजू केटकाळे यांनी जगातील वाहन उद्योगात अग्रभागी असलेल्या टोयोटाच्या देशातील पहिल्या पाच अधिकारी असलेल्या पदापर्यंत मजल मारली. जगभरातील ६० टक्के मोटार गाड्यांचे डिझाईन भारतीय तंत्रज्ञांकडून होते. मराठी पर्यायाने भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जिद्दीने काम करण्याच्या जोरावर अशक्य नाही. ग्रामीण मुलांनी तंत्रज्ञ विषयात पुढे यावे, जग त्यांचेच आहे, अशा शब्दांत राजू केटकाळे यांनी तरुणांना आवाहन केले.केटकाळे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी तंत्रज्ञात कमी पडल्याने भारतीय वाहन उद्योग जगाच्या तुलनेत कमी पडत होता. वाहन उद्योगाला देशात मोठी संधी आहे. मोटार वापरात अमेरिका व जपानमध्ये दर हजारी ६०० नागरिक, तर थायलंडमध्ये ७० आहेत. भारतात हेच प्रमाण १९ ते २५ च्या दरम्यान आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग भविष्यात उचल खाईल. मोटार गाडीचा एक युनिट तब्बल ३० हजार रोजगार उपलब्ध करतो. देशात टोयोटाची अशी दोन युनिट आहेत. तिसरे युनिट लवकरच सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इंडिया’ ही योजना वाहनांसह सर्वच उद्योगांना नव्याने उभारणीसाठी ऊर्जा देणारी आहे. याचे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील. (प्रतिनिधी)वर्षाला एक लाख मोटार गाड्यांचे उत्पादन, १४०० कोटींची वार्षिक उलाढाल अन् आठ हजारांपेक्षा उच्च तंत्रज्ञयुक्त कर्मचाऱ्यांची धुरा सांभाळणारे केटकाळे यांनी वाहन उद्योगाबाबत भवितव्य सांगितले.