शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उद्योगास २०१६ नंतर सुगीचे दिवस

By admin | Updated: December 26, 2014 00:03 IST

राजू केटकाळे : टोयोटा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होण्याचा कोल्हापूरला मान

कोल्हापूर : सध्या मंदीतून वाटचाल करीत असलेल्या वाहन उद्योगास दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ नंतर पुन्हा ऊर्जितावस्था येईल. या काळात मानवी सुरक्षेच्या मानांकनाबाबत देशातील वाहने प्रगत देशाच्या जवळपास जातील. २०१९ पर्यंत जगभरातील प्रगत देशांप्रमाणे वाहन सुरक्षेची मानके देशातील सर्वच वाहनांमध्ये असतील, अशी माहिती कोल्हापुरातील कबनूरचे सुपुत्र टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू केटकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.कबनूर येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण, त्यानंतर कोल्हापुरात महाविद्यालयीन, तर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या राजू केटकाळे यांनी जगातील वाहन उद्योगात अग्रभागी असलेल्या टोयोटाच्या देशातील पहिल्या पाच अधिकारी असलेल्या पदापर्यंत मजल मारली. जगभरातील ६० टक्के मोटार गाड्यांचे डिझाईन भारतीय तंत्रज्ञांकडून होते. मराठी पर्यायाने भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जिद्दीने काम करण्याच्या जोरावर अशक्य नाही. ग्रामीण मुलांनी तंत्रज्ञ विषयात पुढे यावे, जग त्यांचेच आहे, अशा शब्दांत राजू केटकाळे यांनी तरुणांना आवाहन केले.केटकाळे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी तंत्रज्ञात कमी पडल्याने भारतीय वाहन उद्योग जगाच्या तुलनेत कमी पडत होता. वाहन उद्योगाला देशात मोठी संधी आहे. मोटार वापरात अमेरिका व जपानमध्ये दर हजारी ६०० नागरिक, तर थायलंडमध्ये ७० आहेत. भारतात हेच प्रमाण १९ ते २५ च्या दरम्यान आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग भविष्यात उचल खाईल. मोटार गाडीचा एक युनिट तब्बल ३० हजार रोजगार उपलब्ध करतो. देशात टोयोटाची अशी दोन युनिट आहेत. तिसरे युनिट लवकरच सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इंडिया’ ही योजना वाहनांसह सर्वच उद्योगांना नव्याने उभारणीसाठी ऊर्जा देणारी आहे. याचे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील. (प्रतिनिधी)वर्षाला एक लाख मोटार गाड्यांचे उत्पादन, १४०० कोटींची वार्षिक उलाढाल अन् आठ हजारांपेक्षा उच्च तंत्रज्ञयुक्त कर्मचाऱ्यांची धुरा सांभाळणारे केटकाळे यांनी वाहन उद्योगाबाबत भवितव्य सांगितले.