शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वाहन उद्योगास २०१६ नंतर सुगीचे दिवस

By admin | Updated: December 26, 2014 00:03 IST

राजू केटकाळे : टोयोटा इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होण्याचा कोल्हापूरला मान

कोल्हापूर : सध्या मंदीतून वाटचाल करीत असलेल्या वाहन उद्योगास दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ नंतर पुन्हा ऊर्जितावस्था येईल. या काळात मानवी सुरक्षेच्या मानांकनाबाबत देशातील वाहने प्रगत देशाच्या जवळपास जातील. २०१९ पर्यंत जगभरातील प्रगत देशांप्रमाणे वाहन सुरक्षेची मानके देशातील सर्वच वाहनांमध्ये असतील, अशी माहिती कोल्हापुरातील कबनूरचे सुपुत्र टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू केटकाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.कबनूर येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण, त्यानंतर कोल्हापुरात महाविद्यालयीन, तर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या राजू केटकाळे यांनी जगातील वाहन उद्योगात अग्रभागी असलेल्या टोयोटाच्या देशातील पहिल्या पाच अधिकारी असलेल्या पदापर्यंत मजल मारली. जगभरातील ६० टक्के मोटार गाड्यांचे डिझाईन भारतीय तंत्रज्ञांकडून होते. मराठी पर्यायाने भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहे. जिद्दीने काम करण्याच्या जोरावर अशक्य नाही. ग्रामीण मुलांनी तंत्रज्ञ विषयात पुढे यावे, जग त्यांचेच आहे, अशा शब्दांत राजू केटकाळे यांनी तरुणांना आवाहन केले.केटकाळे म्हणाले, दहा वर्षांपूर्वी तंत्रज्ञात कमी पडल्याने भारतीय वाहन उद्योग जगाच्या तुलनेत कमी पडत होता. वाहन उद्योगाला देशात मोठी संधी आहे. मोटार वापरात अमेरिका व जपानमध्ये दर हजारी ६०० नागरिक, तर थायलंडमध्ये ७० आहेत. भारतात हेच प्रमाण १९ ते २५ च्या दरम्यान आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा वाहन उद्योग भविष्यात उचल खाईल. मोटार गाडीचा एक युनिट तब्बल ३० हजार रोजगार उपलब्ध करतो. देशात टोयोटाची अशी दोन युनिट आहेत. तिसरे युनिट लवकरच सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इंडिया’ ही योजना वाहनांसह सर्वच उद्योगांना नव्याने उभारणीसाठी ऊर्जा देणारी आहे. याचे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील. (प्रतिनिधी)वर्षाला एक लाख मोटार गाड्यांचे उत्पादन, १४०० कोटींची वार्षिक उलाढाल अन् आठ हजारांपेक्षा उच्च तंत्रज्ञयुक्त कर्मचाऱ्यांची धुरा सांभाळणारे केटकाळे यांनी वाहन उद्योगाबाबत भवितव्य सांगितले.