शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:32 IST

भारत चव्हाण गेल्या १०-१२ वर्षांत ‘मोबाईल’ क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली; त्यामुळे जग अगदी जवळ आले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून माणसांचे ...

भारत चव्हाणगेल्या १०-१२ वर्षांत ‘मोबाईल’ क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली; त्यामुळे जग अगदी जवळ आले. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून माणसांचे एकमेकांशी संभाषण अधिक सुलभ झाले. त्याच काळात व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखी समाजमाध्यमे विकसित झाली. हजारो मैलांवर असणारी माणसे एकमेकांच्या जवळ आहेत, असाच भास व्हायला लागला. केव्हाही, कुठूनही, कुठेही असताना पलीकडील व्यक्तीशी एकमेकांना पाहत बोलू शकता, इतक ी प्रगती झाली आहे. समाजमाध्यमांचा प्रसार व प्रचार झपाट्याने झाला असल्यामुळे आज-काल ज्याच्या हातात स्मार्टफोन नाही, तो निरक्षर समजला जाऊ लागला आहे. आतापर्यंत जी मंडळी स्मार्टफोनपासून लांब होती, तीदेखील उत्सुकतेपोटी फोन वापरू लागली आहेत. ७० वर्षांचे वृद्ध जसे स्मार्टफोनकडे आकर्षित झाले आहेत, तसेच दोन-तीन वर्षांची मुलेही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आहेत. स्मार्टफोनवर खेळ खेळण्यात ही मुलं अधिक पटाईत आहेत. मोबाईलची क्रांती आणखी कुठंपर्यंत जाईल, हे येणारा काळच सांगू शकेल. एकीकडे एक पिढी माहितीच्या खजिन्यापर्यंत पोहोचली असताना, दुसरीकडे अनेक सुज्ञ नागरिक मात्र हीच पिढी स्मार्टफोनमुळे बिघडत चाललीय, अशा भीतीवजा सार्वत्रिक तक्रार करू लागलेत.कोणत्याही तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही असतात. तंत्रज्ञानात गुण-दोष असणारच. त्यातलं चांगलं काय घ्यायचं हे प्रत्येकानं ठरवायचं असतं. केवळ समाजमाध्यमांच्या तंत्रज्ञानामुळेच तरुण पिढी बिघडणार आहे, अशी तक्रार करणे अयोग्य आहे. समाजात अशा अनेक वस्तू आहेत की, ज्यामुळेसुद्धा तरुण पिढी बिघडण्याची शक्यता असते. उदा. देशी-विदेशी मद्य, चरस, गांजा, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या विनाश करणाºया वस्तू बाजारात खुलेआम उपलब्ध होत आहेत. एकीकडे दारूबंदी, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालायची आणि दुसरीकडे त्यांना विक्रीची परवानगी द्यायची, हे सरकारी धोरण अन्यायकारकच आहे. या वस्तूंमुळे सरकारला कोट्यवधींचा कर मिळतो, तर स्मार्टफोनमुळे खासगी कंपन्यांना कोट्यवधींचा नफा मिळतो; त्यामुळे दोन्हींच्या वापरावर बंधन घालण्याच्या कोणी फंदात पडणार नाही. फक्त आपणच त्याच्या आहारी किती जायचे, हे ठरविले पाहिजे.समाजमाध्यमांचा वापर कसा करून घ्यायचा, हे आपल्याच हातात आहे. त्याचा वाईट वापर टाळून, तो वापर सकारात्मक, परिवर्तनाच्या, अभ्यासाच्या, तसेच चांगल्या गोष्टींच्या अनुकरण करण्याच्या दृष्टीने करून घेतल्यास त्याचा उपयोग अधिक परिणामकारक होईल. चांगल्या अर्थाने तो करूनही घेता येण्यासारखा आहे. समाजमाध्यमांवरील तीन व्हिडीओ क्लिप मला खूप आवडल्या. त्यातून बरंच काही शिकता येण्यासारखं आणि त्याप्रमाणे आपणही वागण्यासारखं आहे. पहिली व्हिडीओ क्लिप स्वच्छतेच्या बाबतीतील आहे. एक लहान मुलगा आपल्या आईसोबत रस्त्यावर उभा आहे. त्याच्या हातात एक छोटी पिशवी आहे. तिकडून एक ट्रक येतो. ट्रक फूटपाथला लागून उभा राहिल्यानंतर हा लहान मुलगा हातातील पिशवी त्या ट्रकमधील कर्मचाºयाकडे देतो. त्या पिशवीमध्ये कचरा असतो. एक लहान मुलगा कचºयाचा ट्रक येईपर्यंत वाट पाहत थांबतो, त्यादरम्यान तो कुठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत नाही. सुंदर अशी ही अनुकरणीय क्लिप आहे. दुसरी क्लिप वाहतुकीच्या संदर्भातील आहे. सकाळच्या वेळी वाहतूक फारशी नसलेल्या वेळी एका चौकात एक कार सिग्नलला थांबलेली आहे. चारही रस्ते मोकळे आहेत. सिग्नलजवळ एकही दुसरे वाहन नाही. कारचालक अधिक वेगाने चौकातून निघून जाऊ शकेल अशी परिस्थिती असतानाही रेड सिग्नल असल्यामुळे तो थांबलेला आहे. सिग्नल आपल्या सोईसाठी आहेत, त्यांचे तंतोतंत पालन करणे आपले कर्तव्य असल्याची त्याची भावना इतरांना बरेच काही शिकवून जाते. तिसरी क्लिपसुद्धा वाहतुकीसंदर्भातीलच होती. दोन महिला रस्त्याच्या एका बाजूकडून दुसºया बाजूला बदके घेऊन चालल्या आहेत. समोरचे चित्र पाहिल्यानंतर लगेच रस्त्यावरील वाहतूक थांबते. हॉर्न न वाजविता वाहनधारक रस्त्यातील बदके जाण्याची शांतपणे वाट पाहत बसले आहेत, अशी ती क्लिप आहे. सार्वजनिक ठिकाणी कार चालवितानाचा चालकाचा संयम आणि त्यांच्यातील स्वयंशिस्त या क्लिपमधून पाहायला मिळते. या तिन्ही क्लिप अर्थातच परदेशातील आहेत, यात शंकाच नाही. आपल्या देशात, राज्यात तसेच शहरात असे शिस्तबद्ध नियम, कायदे पाळण्याच्या सवयी लोकांना कधी लागतील काही सांगता यायचं नाही. मात्र, या क्लिप्स पाहिल्यानंतर प्रत्येकाने त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. सुधारणेची, बदलाची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली तरच लोक बदलतील, समाज बदलेल, अशी अपेक्षा आहे.