शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१४ आॅगस्टला मंत्रालयात शेतकऱ्यांचा बाजार भरणार

By admin | Updated: August 8, 2016 00:32 IST

सदाभाऊ खोत : शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन

इचलकरंजी : १४ आॅगस्ट रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर, तसेच मंत्रालयात शेतकऱ्यांचा बाजार भरविला जाणार आहे. खऱ्या अर्थाने हाच शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिन असणार आहे. सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. येथील घोरपडे नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने रविवारी मंत्री खोत यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाराम देसाई होते. यावेळी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री खोत म्हणाले, १४ आॅगस्टला संत सावळा माळी शेतकरी बाजाराच्या माध्यमातून मंत्रालयात भाजीपाला विकला जाणार आहे. आम्हाला मंत्रालयात येण्यास ज्यांनी विरोध केला, त्यांच्या नाकावर टिच्चून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी लवकरच कोल्हापुरात एक निर्यात केंद्र उभारले जाईल. खासदार राजू शेट्टी यांनी, शेतकऱ्यांचा एक सदा मंत्रालयात गेला. पुढच्या वेळी या संख्येत भर पडली पाहिजे, असे नियोजन करूया. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेची मुदत वाढवून घेण्यात सदाभाऊंना पहिले यश मिळाले आहे. याबरोबरच त्यांनी आता मंत्रालयात थांबून राहून शेतकरी व आमच्याकडून येणाऱ्या विविध योजना व कामांचा पाठपुरावा ज्या-त्या मंत्र्यांकडून करवून घेऊन सर्वांना न्याय द्यावा. तसेच उसाच्या आंदोलनात आता आमदार, खासदारांसह मंत्रीही सहभागी होणार. मात्र, ऊस परिषदच अंतिम निर्णय घेणार. दरम्यान, मंत्री खोत यांचा शाल व श्रीफळ देऊन खासदार शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कामात असणारे गजानन महाजन-गुरुजी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पंचायत समिती सदस्य अश्विनी कांबळे, सावकार मादनाईक, जालंदर पाटील, आदी उपस्थित होते. क्षारपड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ दुष्काळग्रस्त व क्षारपड भागातील शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आले असून, एका योजनेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. याचा पश्चिम महाराष्ट्रालाही लाभ व्हावा, येथील दोन जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. शिवारात राबत राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाहीही मंत्री खोत यांनी दिली.