शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यापेक्षा ‘हनुमान’चे आकर्षण

By admin | Updated: December 15, 2014 00:14 IST

आठवडी बाजार : कडधान्य स्थिर; भाजीपाला, कोथिंबीर घसरली; ‘हापूस’, ‘तोतापुरी’कडे दुर्लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर फळ मार्केटमध्ये या आठवड्यात हापूस व तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली आहे. बंगलोर येथून दररोज वीस बॉक्स आवक सुरू असली तरी या आंब्याला फारशी मागणी नसल्याने दर जेमतेमच आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आलेले हनुमान फळ सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला घसरला असून, घाऊक बाजारात मेथीची पेंडी तीन रुपये, तर कोंथिबीर दोन रुपयांपर्यंत खाली आली आहे. कडधान्याचे दर स्थिर असले तरी शाबूदाणा व सरकी तेलाच्या दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. साधारणत: रत्नागरी, देवगड हापूसची आवक फेबु्रवारी महिन्यात सुरू होते. पण, यंदा बंगलोरमधून हापूस आंब्यांची आवक कोल्हापूर मार्केटमध्ये सुरू झाली आहे. रोज सरासरी वीस बॉक्स आंब्यांची आवक होत असली तरी रत्नागिरीची चव नसल्याने हा आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला नाही. तीच अवस्था तोतापुरी आंब्यांची आहे. साधारणत: पाचशे किलो तोतापुरीची आवक सुरू असून, ७५ रुपये किलोने त्याची विक्री सुरू आहे. सीताफळ, रामफळाची आवक गेले अनेक दिवस सुरू आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी हनुमान फळाची आवक झाली आहे. सांगोला, पंढरपूर येथून आवक होणाऱ्या या फळाचे वजन ७० ते ८० ग्रॅम असते, पिकल्यानंतर ते अधिक गोड लागत असल्याने त्याला मागणी मोठी आहे. साधारणत: १५० ते २०० रुपये डझनाचा दर आहे. संत्र्यांसह माल्टाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. किरकोळ बाजारात संत्री वीस रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. बोरांची आवकही वाढू लागली असून, द्राक्षांची आवक सुरू असली तरी फारच कमी आहे. गेले आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, भेंडी, वरणाचे दर एकदम खाली आले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर राहिले असून, कोथिंबीर, मेथीची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात चढ-उतार असला तरी किरकोळ बाजारात २८ ते ३० रुपये किलोने विक्री सुरू आहे. भाज्यांचे दर (प्रतिकिलो)कोबी : ३ ते ११वांगी : ३ ते २२ टोमॅटो : ३ ते १६ ढब्बू : १५ ते ३५ गवार : २० ते ४० वाटाणा : १७ ते ३५कारली : १३ ते २५दोडका : ७ ते ४०. ‘रत्नागिरी हापूस’ जानेवारीत येणारसध्या बंगलोर हापूसची आवक सुरू असली तरी रत्नागिरी व देवगडच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. या आंब्याची वाट ग्राहक सात-आठ महिने बघत असतो. यंदा खराब हवामान असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हापूस बाजारात दाखल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. गूळ घसरला,कांदा स्थिरावलागेले आठवड्याच्या तुलनेत गुळाच्या दराची प्रतिक्विंटल १०० ते १५०० रुपयांनी खाली आले आहेत. प्रतिक्विंटल २८०० ते ३१९० रुपये दर झाला असून, एक किलो गुळाचा दर २५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. कांदा व बटाट्याचे दर तुलनात्मक स्थिर राहिले आहेत. लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात ‘हनुमान’ फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. पंढरपूर भागातून या फळाची आवक झाली .