शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टीतील विसर्गावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र आणखी दोन दिवस असेच सुरू ...

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र आणखी दोन दिवस असेच सुरू राहिले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे आपल्या अपेक्षेनुसार सध्या अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो योग्यरितीने हाेत आहे ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाऊस आणि पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, सध्या कोल्हापुरातील राधानगरी, दुधगंगा, पाटगांव, वारणा येथील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरला बॅकवॉटरचा त्रास होतो त्यामुळे अलमट्टीतून सुरू असलेल्या विसर्गावर कोल्हापूर, सांगलीचे लक्ष आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत चर्चा झाल्यानंतर विसर्ग अपेक्षेप्रमाणे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी अलमट्टीवर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या योग्यरितीने विसर्ग सुरू आहे. मात्र पाऊसच इतका पडत आहे की पाणी वाहून जाण्यालादेखील मर्यादा आहेत. घाटमाथ्यावर ४०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत आहे मे-जूनमध्ये पाऊस पडला त्याचवेळी धरणातील पाणी सोडल्याने पुराचा धोका कमी झाला आहे. पण कितीही पाऊस येऊ दे पुराशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनीही पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये.

------

चिखलीतील ३२५ कुटुंबांचे स्थलांतर

पुराने सर्वात आधी चिखली आणि आंबेवाडी ही दोन गावं बाधीत होतात त्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर सुरू असून गुरुवारी चिखलीतील ३२५ कुटुंबांचे जनावरांचे सोनतळी येथे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या करवीर आणि शिरोळमध्ये एनडीआरएफची पथके पाठवण्यात आली असून गरज भासली तर राज्य शासनाकडे आणखी पथकांची मागणी केली जाईल.

---

कोरोनाबाधित व सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र सोय

सध्या अनेक कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत त्यांचे स्थलांतर करताना काय खबरदारी घेतली आहे यावर ते म्हणाले, प्रशासनाने स्थलांतराच्या ठिकाणी कोरोनाबाधितांची व सर्वसामान्य नागरिकांची स्वतंत्र सोय केली आहे.

---