शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

जिल्हानिहाय कामांचा आराखडा करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:01 IST

कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्णांचे आहे. या जिल्ह्णांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्णातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह ...

कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्णांचे आहे. या जिल्ह्णांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्णातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.महामंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. महामंडळाचे काम करताना मला कायमच ‘लोकमत’कडून सहकार्य लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी या महामंडळाची रचना, उद्देश सांगितला. कोल्हापूरला जाधव यांच्या निमित्ताने या महामंडळावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.जाधव म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन कामाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. त्याच त्याच स्वरूपाची कामे करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील काही वेगळ्या धाटणीची कामे करण्यावर आपला भर राहील. या महामंडळासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याने निधीची अडचण असणार नाही. या महामंडळाचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचाही पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांनाही उपस्थित राहून त्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावू.’यावेळी ‘लोकमत’मधील सर्व विभागप्रमुख व बातमीदारांसमवेत त्यांनी सुमारे तासभर संवाद साधला.शिरोळमधीलकॅन्सरचे संशोधनशिरोळ तालुक्यात मुख्यत: कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परवाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊनही सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वळविले आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने या तालुक्यात नव्याने संशोधन करून या प्रश्नाची तीव्रता शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्याचा विचार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले.