शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न - अरुण नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST

(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या ...

(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र मूठभर विरोधकांकडे ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता, स्टंट करायचा म्हणून त्यांच्याकडून सभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सभाध्यक्ष अरूण नरके यांनी बुधवारी केला.

‘गोकुळ’च्या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नरके म्हणाले, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे सभेच्या सुरुवातीलाच आपण आवाहन केले असताना काही मंडळींना दंगा करायचा होता. संपूर्ण सभेत ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने जुन्या गोष्टींवर आग्रह धरणे योग्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक सुज्ञ आहेत.

संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, काटकसरीचा कारभार केल्यामुळेच संघाच्या २५० कोटींच्या ठेवी आहेत. भविष्यातील विचार करूनच विस्तारीकरण केले. त्यावेळी केले नसते तर आजचे १५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोठे करायची होती? मुद्दाच नसल्याने चांगल्या चाललेल्या दूध संघाच्या बदनामीचा उद्योग सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, उदय पाटील, सत्यजित पाटील, बाबा देसाई, अनुराधा पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर, अंबरीश घाटगे उपस्थित होते.

पिक्चर अभी बाकी है !

प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वच संचालक उपस्थित होते. यावर तीन संचालकांनी स्वतंत्र ठराव दाखल केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर, ‘पिक्चर अभी बाकी है,’ एवढीच प्रतिक्रिया अरुण डोंगळे यांनी दिली.

प्रवीणसिंहांकडे म्हैशी कोठे आहेत?

सभेनंतर बोलताना ‘बिद्री‘चे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी ‘गोकुळ’चे पशुखाद्य बनावट असून त्यामुळे २५ म्हैशी दगावल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याचा आरोप केला. त्याबाबत विचारले असता, प्रवीणसिंहाकडे म्हैशी कोठे आहेत? अशी मिश्कील टिपणी रणजीतसिंह पाटील यांनी केली.

नरके यांच्याकडून घाणेकरांची पाठराखण

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे ‘एनडीडीबी’चे सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्यावर सर्व संचालकांचा विश्वास आहे. मात्र त्यांना काम तरी करू दिले पाहिजे, असे अरुण नरके यांनी सांगितले.