शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

‘आरपीआय’चा हल्लाबोल

By admin | Updated: June 9, 2015 01:17 IST

बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; पोलिसांशी बाचाबाची

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरू चौक परिसरात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी निवेदन स्वीकारण्यास आले नसल्याच्या रागावरून रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले) गटातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.डॉ. आंबेडकर यांचा गांधीनगर येथील शिरू चौकातील पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आरपीआय’तर्फे सोमवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात रिक्षा, दुचाकीसह शेकडो भीमसैनिक सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा ‘जय भीम’च्या घोषणा देत अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या निरोपानुसार प्रा. शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे शिष्टमंडळाकडून निवेदन घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अँटी चेंबरमध्ये बोलावले; पण कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याचा आग्रह धरत होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत पुन्हा बाहेर पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. धक्काबुक्की करत कार्यकर्ते गेटच्या बाहेर आले आणि तिथे ठिय्या मांडला. तसेच पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षकांनी निवेदन स्वीकारलेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव घटनास्थळी पोहोचले. अमरसिंह जाधव यांनी हे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. निवेदनाची पोहोच कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधीनगरकडे कूच केली. या मोर्चात बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, सुखदेव बुध्याळकर, कुलदीप जोगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.