शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

‘आरपीआय’चा हल्लाबोल

By admin | Updated: June 9, 2015 01:17 IST

बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; पोलिसांशी बाचाबाची

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरू चौक परिसरात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी निवेदन स्वीकारण्यास आले नसल्याच्या रागावरून रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले) गटातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.डॉ. आंबेडकर यांचा गांधीनगर येथील शिरू चौकातील पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आरपीआय’तर्फे सोमवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात रिक्षा, दुचाकीसह शेकडो भीमसैनिक सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा ‘जय भीम’च्या घोषणा देत अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या निरोपानुसार प्रा. शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे शिष्टमंडळाकडून निवेदन घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अँटी चेंबरमध्ये बोलावले; पण कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याचा आग्रह धरत होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत पुन्हा बाहेर पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. धक्काबुक्की करत कार्यकर्ते गेटच्या बाहेर आले आणि तिथे ठिय्या मांडला. तसेच पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षकांनी निवेदन स्वीकारलेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव घटनास्थळी पोहोचले. अमरसिंह जाधव यांनी हे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. निवेदनाची पोहोच कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधीनगरकडे कूच केली. या मोर्चात बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, सुखदेव बुध्याळकर, कुलदीप जोगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.