शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

‘आरपीआय’चा हल्लाबोल

By admin | Updated: June 9, 2015 01:17 IST

बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन; पोलिसांशी बाचाबाची

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील शिरू चौक परिसरात बसवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी निवेदन स्वीकारण्यास आले नसल्याच्या रागावरून रिपब्लिकन पार्टीच्या (आठवले) गटातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.डॉ. आंबेडकर यांचा गांधीनगर येथील शिरू चौकातील पुतळा कायमस्वरूपी ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आरपीआय’तर्फे सोमवारी निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी एकच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात रिक्षा, दुचाकीसह शेकडो भीमसैनिक सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा ‘जय भीम’च्या घोषणा देत अडीच वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या निरोपानुसार प्रा. शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे शिष्टमंडळाकडून निवेदन घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना अँटी चेंबरमध्ये बोलावले; पण कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याचा आग्रह धरत होते. मात्र, जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देत पुन्हा बाहेर पडले. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले. धक्काबुक्की करत कार्यकर्ते गेटच्या बाहेर आले आणि तिथे ठिय्या मांडला. तसेच पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षकांनी निवेदन स्वीकारलेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव घटनास्थळी पोहोचले. अमरसिंह जाधव यांनी हे निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. निवेदनाची पोहोच कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी गांधीनगरकडे कूच केली. या मोर्चात बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, सुखदेव बुध्याळकर, कुलदीप जोगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.